नाणेघाट ट्रेक आणि तेथील ओढ्यांचा थरार



प्रवासाची तारीख: २३-जुलै-२०२२
वाहतुकीची पद्धत: राज्य परिवाहन बस



नाणेघाटाचा इतिहास


    मौर्य राजा नंतर सत्तेत आलेल्या सातवाहन राजांनी हा घाट खोदला. या घाटात सातवाहनांनी एक लेणे तयार करत त्यामध्ये त्यांच्या कुलाची गाथाही कोरून ठेवलेली आढळते. येथे असलेल्या लेखात सातवाहन सम्राज्ञी नागणिके विषयी माहिती मिळते. या लेखांमध्ये महाराष्ट्राच्या आद्य राज्यकुल, त्यांचा पराक्रम, दानधर्माबद्दल माहिती आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठया भूप्रदेशावर राज्य करणारा सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारेचार शतके सलगतेने राज्य करत होता. या काळात त्यांचे तीस पराक्रमी राजे होऊन गेले. या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण), जीर्णनगर (जुन्नर), तगर (तेर), नेवासे, नाशिक अशी भरभराटीला आलेली शहरे या राजवटीत उदयास आली. अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘नाणेघाट’ हा प्रमुख मार्ग होता.

    येथील एका लेखात सातवाहनांच्या पराक्रमाशिवाय त्यांनी इथे केलेले यज्ञ, दानधर्माचे उल्लेख आहेत. सातवाहन राजांनी दोनदा अश्वमेध यज्ञ केला असे दिसून येते. याशिवाय वाजपेय यज्ञ, राजसूय यज्ञ असे तब्बल २२ यज्ञ इथे पार पडल्याची माहिती हे लेख देतात. हजारो गाई, शेकडो हत्ती, घोडे, खेडी, धान्य, वस्त्र-अलंकार आणि तत्कालीन सातवाहनांची कार्षांपण या नाण्यांचा मोठा दानधर्म केल्याचाही यात उल्लेख येतो. (सौजन्य - विकिपीडिया).





नानाचा अंगठा
नानाचा अंगठा



प्रवासवर्ण

    कोविड लॉकडाऊन नंतरचा हा पहिला ट्रेक होता; त्यामुळे या पावसाळी ट्रेकसाठी मी खूप उत्सुक होतो. मी दादर रेल्वे स्थानकातून सकाळी ५:१५ ला प्रवास सुरु केला आणि सकाळी ६:३५ च्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचलो. मित्र विनायक कल्याण स्थानकात माझी वाट बघत उभा होता. कल्याण स्थानकावरून आम्ही कल्याण पश्चिमेस असलेल्या राज्य परिवाहन बस डेपोकडे चालत गेलो, बस डेपो १० मिनिटांच्या अंतरावर आहे. आळे फाटा किंवा माळशेज घाटमार्गे जाणारी "कल्याण ते अहमदनगर" ह्या मध्ये बस चढलो. नाणेघाट हा अधिकृत बस थांबा नसल्यामुळे आम्ही बस कंडक्टरला नाणेघाट कमानी जवळ सोडण्याची विनंती केली. (ऑफिशियल बस स्टॉप टोकवडे येथे आहे, जे नाणेघाटच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून ५ किलोमीटर अंतरावर आहे.) आम्ही सकाळी ९:१५ च्या सुमारास नाणेघाट येथे उतरलो आणि जवळच्या स्टॉलवर नाश्ता केला. बस कंडक्टरने आम्हाला नाणेघाट कमानी जवळ सोडल्याबद्दल धन्यवाद!

    सकाळी ९:४५ च्या सुमारास आम्ही चढायला सुरुवात केली, नाणेघाट माथ्यावर पोहोचायला ३ तास ​​लागतील आणि उतरायला तेवढाच वेळ लागणार याची कल्पना होती. पहिल्या कमानी जवळ वन विभागाची चौकी होती. नुकतेच वन विभागाचे अधिकारी तिथे आले होते, आम्ही अजून थोडे लवकर आलो असतो तर वन विभागाचे शुल्क भरावे लागले नसते. वन विभागाच्या रजिस्टर मध्ये नोंद केली आणि प्रत्येकी ३० रुपये भरून ट्रेकला सुरुवात केली. काही अंतर पुढे गेल्यावर आम्ही दुसऱ्या कमानी जवळ आलो, ती पार करत आम्ही पहिल्या ओढ्यापाशी पोहोचलो (नाणेघाट मार्गावर एकूण ३ ओढे लागतात). ओढ्याला पाणी कमी होते (टाचे एवढेच) म्हणून आम्ही ओढ्याच्या किनारी थोडी विश्रांती घेतली, काही चांगले फोटो काढले आणि पुढे निघालो. काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला दोन पायवाट दिसल्या, आम्ही डावीकडच्या वाटेने पुढे गेलो आणि दुसऱ्या ओढ्या पाशी आलो. (डावीकडील वाट ही नाण्याच्या अंगठ्याकडे जाते तर उजवी वाट गावात जाते). दुसरा ओढा ओलांडत आम्ही काही अंतर पुढे गेलो आणि तिसऱ्या ओढ्या पाशी आलो. हाही जोधा ओलांडत पुढे गेलो आणि एक छोटासा अवघड टप्पा पार करत पठारावर पोहचलो. नानाचा अंगठा अगदी सुंदर दिसत होता! काहीवेळ पठारावर फोटो काढण्यात घालवल्यावर पुन्हा चढायला सुरवात केली. अडीच तास चढून गेल्यावर आम्हाला एका पाण्याचे टाके दुर्ष्टीस पढले, हे पाण्याचे टाके दिसणे म्हणजे डोंगर माथा जवळ आल्याची खूण होती. आम्ही पुढे गेल्यावर व्हिव पॉईंट दिसला, पण हा व्हिव पॉईंट ढंगानी झाकला होता, काहीच दिसत नव्हते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने लावलेली रेलिंग मात्र दिसत होती. अखेरीस, आम्ही १२:४५ च्या सुमारास मुख्य लेणीत पोहोचलो. लेणी जवळील दृश्य आणि वातावरण आल्हाददायी होते, आपण जणू स्वर्गातच आलो आहोत असे वाटत होते.


पाण्याचे टाके
पाण्याचे टाके



    लेणीच्या परिसरात बरीच गर्दी होती, जुन्नर मार्गे बरेच पर्यटक गाडीने आले होते. गर्दी पाहून थोडी निराशा झाली करी पण आता काही पर्याय नाही होता. आम्ही लेणीत गेलो, तेथील ब्राम्ही लिपीत लिहिले लेख पाहत थोडा वेळ घालवाल आणि डोंगर माथ्यावर जायचे ठरवले.
टीप: लेणीतील तीनही भिंतींवर ब्राम्ही लिपीत लेख लिहलेला आहे, ह्या लेखात राज सत्कारणी यांची पत्नी नागनिका हिने केलेल्या यज्ञ व दान धर्म याची माहिती लिहलेली आहे. 

डोंगर माथ्यावर जाण्या करीत आम्ही लेणीतून बाहेर आलो आणि आमची भेट एका जर्मन पर्यटकाशी झाली. त्याच्या सोबत त्याची भारतीय मेत्रीन होती. त्यांनी आम्हाला नाणेघाटाबद्दल माहिती विचारली असता, थोडक्या माहिती दिली आणि चौघेही जण रिवर्स वॉटरफॉल (उलटा धबधबा) पाहण्या करता डोंगरमाथ्यावर जायला निघालो. लेणी ते डोंगरमाथा हे अंतर अवघे ५० एक मीटर चे असेल, पण शेवाळ असल्या कारणाने चालणे अवघड झाले होते. काळजी पूर्व पाऊले टाकत आणि तोल सावरत आम्ही माथ्यावर पोहचलो. आमचे दुर्दैव असे की टेकडीचे पठार किंवा माथा पूर्णपणे ढगांनी झाकलेला होता, ५० मीटरच्या पुढे दिसत नव्हते. आम्ही बराच प्रयत्न केला, पण रिवर्स वॉटरफॉल काही दिसला नाही, म्हणून आम्ही रांजण (नाणे - कर गोळा कार्याचे दगडी भांडे) पाहण्या करीत गेलो, या रांजांचा उपयोग प्राचीन काळी व्यापाऱ्यांकडून टोल वसूल करण्यासाठी केला जात होता. पुरातत्व खात्याने या रंजनाची डागडुजी केलेली आहे व एक दगडी चवथरा बांधून त्यावर रांजण सुरक्षित ठेवले आहे. 

ब्राम्ही लिपीतील लेख
ब्राम्ही लिपीतील लेख 
नाणे (कर) गोळा करण्या करीत दगडी रांजण
नाणे (कर) गोळा करण्या करीत दगडी रांजण

    जर्मन पर्यटक आणि त्याच्या मैत्रिणीसोबत गरम गरम भजी खाल्ली आणि चहा प्यालो. एक सेल्फी काडून त्यांचा निरोप घेतला  आणि आम्ही नानाच्या अंगठ्यावर जायायचे ठरवले, पण अचानक पाऊस वाढला आणि वाऱ्याचा प्रवाह इतका वाढला की आम्ही मागे ढकलले जात होतो. त्यामुळे तोल सावरणे कठीण जात होते, धोका टाळण्यासाठी आम्ही आमचा बेत रद्द केला आणिपाण्याच्या टाक्यात कोरलेली गणपतीची मूर्ती  पाहायला गेलो. डोंगर माथ्यावर तासभर घालवल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला, पण यावेळी जुन्नरमार्गे मुंबईला परतण्याचा विचार होता. आमच्याकडे पुरेशी माहिती नसल्याने आणि कोणतीही वाहने लिफ्ट देण्यास तयार नसल्याने आम्ही जुन्नरला जाण्याचा प्लॅन रद्द केला. तेथून निघायच्या वेळी, एक पर्यटक आम्हला भेटला. हा पर्यटक त्याच्या समुहापासून वेगळा झाला होता, डोंगरमाथ्यावर मोबाइलला नेटवर्क नसल्या कारणाने संपर्क करणे अवगढ होत होते, त्यात गडद धुके इतर सभासदांना शोधायचे कसे हा मोठा प्रश्न होता. विनायक कडे जिओच्या सिमला नेटवर्क होते. त्याने ग्रुप लीडरला कॉल केला पण त्याने काही उत्तर दिले नाही. त्याला आम्ही आमच्या सोबत यायला सांगितले, पण त्याच्या पायाला क्रॅम्प आल्या कारणाने उतरणे शक्य नाही असे त्याने सांगितले व तो घाटघर मार्गे जुन्नरला जायायला निघाला.

सूचना : जेव्हापण आपण मोठ्या समूहात दुर्गम भागात ट्रेकिंगला जाल, तेव्हा तेथे मीटिंग पॉईंट ठरवावेत, म्हणजे जर कोणी चुकले व समूहातून वेगळे झाले तर त्या व्यक्तीने मीटिंग पॉईंट कडे जाऊन ग्रुप लीडरची वाट पाहत उभे राहावे, जेणे करून ग्रुप लीडर व इतर सभासदांचे काम सोपे होते, हरवलेल्या व्यक्तीला शोधण्यात वेळ वाया जात नाही.

     आम्ही दुपारी २:१५ च्या सुमारास उतरायला सुरुवात केली, जसजसा वेळ वेळ पुढे जात होता तसतसा पावसाचा जोर वाढत होता यामुळे खाली उतरणे आम्हला अवघड जात होते. पुढे जाऊन आम्ही एका मोठ्या समस्येच्या सामोरी चाललो होते हे अवगत नव्हते! मी ब्लॉगच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आम्ही तीन पाण्याचे ओढे पार केले होते. परतत असताना, आम्ही तिसऱ्या पाण्याच्या प्रवाहाजवळ पोहोचलो (उलट क्रमाने) आणि पाहिलं की मुसळधार पावसामुळे ओढ्याचा प्रवाह वाढला होता व पाणी गढूळ झाले होते. आम्ही मदतीची वाट पाहण्याचे ठरवले. काही वेळाने एक किशोरवयीन गट आला. पाण्याचा प्रवाह पाहून ते सुद्धा विचारात पढले, पण त्यांनी एकमेकांचे हात पडकून मानवी साखळी तयार केली आणि ओढा ओलढण्यास सुरवात केली, त्यामुळे आम्हीही त्यांच्यात सहभागी झालो. आम्ही जो निर्णय घेतला होता तो चुकीचा होता व आम्ही आमचा जीव धोक्यात घालत असल्याचे पूर्ण जाणीव होती. ज्याच्या बारवश्यावर ओढा पार करत होतो, ती व्यक्ती ओढ्याचे मधोमध जाऊन बावचली आणि आम्ही सर्वजण ओढ्याच्या मधोमध आढक्लो. त्या क्षणी नोको नको ते विचार मनात येऊ लागले. इतक्या एक मुलगा मग्न आला आणि त्याने ओढ्या उडी मारली आणि आम्हा सर्वांना बाहेर काढले. हा ओढा तर ओलांडला होता पण पुढे आजून दोन ओढे ओलांडायचे होते. आम्ही किशोरवयीन गटासह पुढे निघालो आणि दुसऱ्या ओढ्या जवळ पोहोचलो (उलट क्रमाने). या ओढ्यात, आम्हाला आधारासाठी कोठेही मोठे खडक दिसत नव्हते. जीव धोक्यात घालायचा नाही म्हणून मी जंगलात रात्र घालवायचे ठरवले, पण विनायक मात्र जंगलात रात्र घालवण्यास तयार नव्हता. रात्र घालवण्याकरिता आमच्यकडे पर्याप्त पाणी आणि खाऊ होते, फक्त डोक्यावर छत नव्हते. मी एके ठिकाणी जाऊन बसलो. ओढ्याच्या पलीकडच्या बाजूस असलेल्या एका ट्रेकर ने मला पहिले आणि ओढा ओलांडण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याने हा ओढा नुकताच पार केला होता, घाबरायचे काही कारण नाही असे सांगितले. मानवी साखळी करण्यासाठी आम्ही पुन्हा किशोरांच्या गटात सामील झालो आणि जीव मुठीत गेहून ओढायचा उतरलो. देवाच्या कृपेने सुखरूप ओढा पार केला. आम्हाला ओढे पार करण्यास मदत केल्याबद्दल ट्रेकर ग्रुपचे आणि देवाचे आभार मानतो.

टीप: पाऊस सुरू राहिल्यास, ओढ्यांतील पाण्याचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे ओढे ओलांडणे कठीण किंवा अशक्य होते. जंगलात रात्र घालवण्याची परिस्थिती उद्भवल्यास काही खाद्य पदार्थ, सुखे कपडे, पाणी बॉटल प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून सोबत ठेवावे. ओढे ओलांडण्याचा प्रयन्त करून आपला जीव धोक्यात घालू नये.


    तिसऱ्या ओढ्या जवळ पोहोचलो आणि सुखद धक्का मिळाला, धरणाच्या भिंतीमुळे पाण्याचा प्रवाह खूपच कमी होता. कमी प्रवाह पाहून आम्ही सुटकेचा श्वास सोडला! तिन्ही ओढे पार करून झाल्यावर, मुंबई करीत बस पकडण्याकरिता आम्ही आमचा वेग वाढवला. ओढ्याची समस्या तर पार केली होती, पण नवीन समस्या उद्भवणार होती, तिच्याशीही आम्ही अवगत नव्हतो . राज्य परिवहन बस व खाजगी वाहनांना आम्ही हात दाखवून लिफ्ट साठी थांबव्याचा प्रयत्न करत होतो, पण एकही वाहत थांबत नव्हते. आम्ही जवळपास ३० मिनिटे थांबलो आणि मग ३ किमी अंतरावर असलेल्या वैशाखरे गावाकडे चालत जाण्याचा निर्णय घेतला. साधारण ५:३० वाजले होते, आम्ही खूप दमलो होतो पण वैशाखरे गावाकडे चालत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. २ किमी चालल्यानंतर आम्हाला एक ढाबा दिसला, तेथे जेवण करून पुढचा प्रवास करायचा असे ठरवले. जेवणानंतर, आम्ही हॉटेल मालकाकडे वाहनासाठी मदत मागितली, पण आधीच उशीर झाला होता सायंकाळचे ६:०० वाजले होते आणि त्यात मुसळधार पाऊस यामुळे रिक्षा किव्हा इतर वाहन मिळणे शक्य नव्हते, म्हणून त्याने आम्हाला वैशाखरेला जाऊन टोकावडे करीत ऑटो मिळेल असे सांगितले. पण वैशाखरे अद्याप १ किमी दूर होते 😟.

    थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा वैशाखरे गावाकडे परतीचा प्रवास सुरू केला. संध्याकाळी ६:३० वाजता वैशाखरे गावात पोहोचलो, सुदैवाने रेस्टॉरंटजवळ एक ऑटोरिक्षा उभी होती. रिक्षावाले काका, त्यांचा मोबाइलला रेस्टऑरेंत मध्ये विसरले होते म्हणू माघारी आले होते, पण त्यांचे मोबाईल विसरणे आमच्या फायद्याचे ठरले होते. आम्ही त्यांचा टोकावडे बस स्टँडवर सोडायला सांगितले. (ऑटोरिक्षासाठी संपर्क क्रमांक: ९०२१०८६३५३) टोकावडे येथे आम्ही राज्य परिवहन बसची वाट पाहत होतो. संध्याकाळी ७:००  च्या सुमारास, बस आली (जुन्नर-ठाणे). विनायक कल्याणला उतरला तर मी ठाण्याला उतरलो. पायात त्राण उरले नव्हते म्हणून नाईलाजास्तव ओला - टॅक्सी बुक केली आणि गोरेगावला घरी ११:०० वाजता पोहचलो.


    हा ट्रेक सोपा असला तरी मुसळधार पाऊस आणि परतीच्या प्रवासाचे नियोजन नसल्यामुळे तो अवघड आणि कठीण झाला.


नाणेघाटाजवळ पाहण्यासारखी ठिकाणे

जीवधन किल्ला
माळशेज घाट
    
    

खर्चाचा तपशील





यादृच्छिक छायाचित्रे

नामफलक
नामफलक

नाणेघाट प्रवेशद्वार कमान
नाणेघाट प्रवेशद्वार कमान


👉 ब्लॉगच्या सुरवातीला जा