पद्मदुर्ग, सामराजगड आणि रेवदंडा सहल

  

प्रवासाची तारीख: १७ डिसेंबर २०२३

वाहतुकीची पद्धत: बस आणि बोट



किल्ल्यांचा इतिहास

1. पद्मदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये अरबी समुद्रातील बांधलेल्या सागरी किल्ल्यांपैकी एक. पद्मदुर्ग हा कासा (कासवाच्या आकाराचा) बेटावर बांधलेला असून, याचे बुरुज कमळाप्रमाणे दिसतात म्हणून याला पद्मदुर्ग असे नाव दिले. स्वराज्याचे आरमार हे नवखे असल्या कारणाने, अनुभवी आणि बलाढ्य सिद्दीच्या आरमाराशी समोर समोर युद्ध करणे अशक्य होते, तसेच जंजिरा काबीज करण्याचा प्रयत्न ही फसला होता. सिद्दीच्या समुद्धरी हालचालींनवर आळा घालयन्य करिता महाराज्यांनी जंजिरेकर सिद्दीच्या उरावर नवीन जंजिरा वसविला. २०१२ मध्ये स्वच्छता उपक्रमांदरम्यान, भारतीय पुरतत्व खात्यातील अधिकाऱ्यांना ऐतिहासिक मूल्याचे सुमारे २५० तोफगोळे सापडले. शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६७६ साली बांधला जेव्हा कोणतेही तंत्रज्ञान विकसित नव्हते, जसे आज आहे. किल्ला बांधताना अनेक वेळा शत्रूचे हल्ले झाले, सर्व हल्ले परतवून किल्ला उभा केला, आणि आज पुरावतत्व खाते, सोयसुविधांच्या अभाव असल्याचे कारण देत किल्ल्याची डागडुजी करणे टाळत आहे!

किल्ले पद्मदुर्ग

किल्ले पद्मदुर्ग

२. सामराजगड’ उर्फ ‘दंड-राजपुरी’ हा मुरुड गावाच्या समुद्र किनाऱ्याच्या नैऋत्येला एका टेकडीवर वसलेला आहे आणि प्रसिद्ध जंजिरा किल्ल्याजवळ आहे. शिवाजी महाराजांनी जंजिऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि जमिनीवरून त्याचा प्रवेश तोडण्यासाठी बांधला होता. जंजिर्‍यावरील हल्ल्यांसाठी मुख्य तळ म्हणून सामराजगडचा वापर केला गेला. जंजिरा सिद्दीच्या ताब्यात होता, हा किल्ला बांधण्यासाठी शिवाजी महाराजांनी व्यंकोजी दत्तो यांना पाठवले. सामराजगड हे जंजिर्‍याच्या अगदी जवळ असल्याने व्यंकोजीला संरक्षणासाठी मराठा सैनिकांची एक पलटण देण्यात आली. व्यंकोजीने सिद्दीच्या घोडदळांशी युद्ध केले आणि दंड-राजपुरीच्या आसपासचा प्रदेश काबीज केला. या युद्धात सुमारे ३०० हबशी मारले गेले. सिद्दीने युध्द करण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही.

     राजापुरीजवळील टेकडीवर सामराजगड बांधला गेला. सामराजगडाच्या उभारणीमुळे सिद्दीसाठी मुरुडचा प्रवेश बंद झाला. आपल्या व्यापारी मार्गावरील हे बंधने दूर करण्यासाठी सिद्दीने सामराजगडावर हल्ला केला. त्याने लहान बोटींमध्ये सैनिक आणि तोफगोळे पाठवले. त्यांनी ताडाच्या झाडांना तोफ बांधून किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु झाडे कोसळली आणि हल्ला फसला. या अपयशानंतर सिद्दीने पुढील हल्ल्याची काळजीपूर्वक योजना केली. शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी रायगड सोडला होता. त्याआधी सिद्दीला सम्राजगड काबीज करायचा होता. दुसऱ्या हल्ल्याचे नेतृत्व सिद्दी खैरात आणि सिद्दी कासिम यांनी केले.

     ११ फेब्रुवारी १६७१ रोजी एका अंधाऱ्या रात्रीच्या आच्छादनाखाली सिद्दी खैरातने किल्ल्याच्या बाजूने ५०० हबशी सैनिकांसह हल्ला केला. त्या दिवशी होळीचा सण होता आणि मराठा सैनिक सन साजरा करण्यात दंग होते. तरीही त्यांनी प्रतिआक्रमण केले आणि सिद्दी खैरातचा चांगलाच सामना केला. दरम्यान, सिद्दी कासीम समुद्रमार्गे बोटीतून किल्ल्याजवळ आला होता. त्याने किल्ल्याच्या तटबंदीला शिडी आणि दोरी लावली. मराठा सैनिक सिद्दी खैरातशी लढण्यात व्यस्त असताना, सिद्दी कासिम आणि त्याचे सैनिक तटबंदीवर चढून किल्ल्यात घुसले. मराठा सैन्य चिमटित अडकले होते. प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी कडवी झुंज दिली. दारू कोठाराला आग लागली आणि स्फोट झाला आणि मराठ्यांची हार झाली. दोन्ही बाजूंचे शेकडो सैनिक मारले गेले. स्फोटाची बातमी ऐकून शिवाजी महाराजांनी आपले सैन्य पथक सामराजगडावर पाठवले. तोपर्यंत सम्राजगड मराठ्यांच्या हातून गेला होता. या पराभवामुळे शिवाजी महाराजांना जंजिर्‍यावरील आपला नियोजित हल्ला रद्द करावा लागला.

किल्ले साम्राजगडावरील तळे

किल्ले साम्राजगडावरील तळे 

3. रेवदंडा या ठिकाणचा इतिहास भगवान श्रीकृष्णाच्या प्राचीन पौराणिक काळापासूनचा आहे. पुराणकथेनुसार असे मानले जाते की संपूर्ण रेवदंडा परिसर प्राचीन "रेवतीक्षेत्र" होता, जिथे कृष्णाचा भाऊ बलराम यांची पत्नी रेवती राहत होती. ही जागा कृष्णाने रेवतीला तिच्या लग्नाच्या वेळी भेट म्हणून दिली होती. दुसरी कथा अशी आहे की राजा हंसध्वजाने अश्वमेध यज्ञाचा घोडा येथे थांबवला आणि रेवदंडाने त्याच्या आणि महान अर्जुनामध्ये हिंसक युद्ध पाहिले.

     रेवदंडा हा चौल चाच एक भाग आहे, चौल हे अति प्राचीन बंदर, याला चंपावती या नावानेही ओळखले जायचे (चंपावती म्हणजे चाफ्याची भरपूर फुले असलेला प्रदेश). रोमन, चीन, ग्रीक, इजिप्त अश्या अनेक देश्यांशी व्यापार चौल बंदरावरून होत असे. चौल वर ताबा मिळवण्या करिता जागतिक पातळीवर युद्ध झाले होते, गुजरातचा सुलतान, इजिप्त चे नौदल आणि कालिकतचा राजा विरुद्ध पौर्तुगीज असे संयुक्त युद्ध झाले आणि यात पोर्तुगीजांचा पराभव झाला. 

    रेवदंडा किल्ला निर्मिती आधी येथे गुजरातच्या सुलतानाचे राज्य होते, १५२१ मध्ये पोर्तुगीज आणि सुलताना मध्ये झालेल्या तहा नंतर चौल हा प्रोतुगीजांच्या ताब्यात गेले. १५२१ मध्ये पोर्तुगीजांनी कुंडलिका नदीच्या मुखावर, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर रेवदंडा किल्ला बांधायला सुरवात केली आणि त्याच वर्षी किल्ला बांधून पूर्ण झाला.

     त्यावेळच्या अनेक बलाढ्य शासकांनी किल्ल्याला वेढा घातला होता, पण त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. १६३६ - १६८३ या कालावधीत आंग्रे राज्यकर्त्यांनी किल्ला ताब्यात घेण्याचा वारंवार प्रयत्न केला आणि १७३६  मध्ये मराठ्यांनीही प्रयत्न केले. १७४० मध्ये पोर्तुगीजांनी केलेल्या करारानुसार रेवदंडा किल्ल्यासह मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. १८१८ मधे, रेवदंडा किल्ला ब्रिटिश राजवटीत गेला.

किल्ले रेवदंड्याची तटबंदी

किल्ले रेवदंड्याची तटबंदी



प्रवास आणि ट्रेकचा अनुभव

    साधारणपणे आम्ही आमच्या सहलींचे नियोजन स्वतःच आखतो, पण पद्मदुर्ग सागरी किल्ल्याला असल्याने बोटीने जावे लागते, बोटीचे शुल्क जास्त असल्याने, मोठ्या समूहात जाणे आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर ठरते, म्हणून आम्ही "डोंगर यात्रा" या प्रवास आणि ट्रेकिंग ग्रुपमध्ये सहभागी झालो. प्रति व्यक्ती १७०० खर्च येणार होता ज्यात पद्मदुर्ग, सामराजगड आणि रेवदंडा किल्ले पाहणी, नाश्ता आणि जेवणाचा समावेश होता. मी आणि माझे दोन मित्र विनायक आणि अमेय तिघांनी जाण्याचे निश्चित करून आम्ही आमच्या जागा आरक्षित केल्या. "डोंगर यात्रा" ने टेम्पो ट्रॅव्हलरची व्यवस्था केली होती जी रात्री १०:०० वाजता १६ डिसेंबर २०२३ रोजी दादर हुन निघणार होती, सानपाडा, चेंबूर, नेरूळ, कामोठे इत्यादी अनेक पिकअप पॉइंट होते. सानपाडा हे विनायकसाठी जवळचे स्थानक होते तर नेरूळ हे अमेयसाठी सर्वात जवळचे स्थानक होते म्हणून त्यांनी त्यानुसार बसमध्ये चढण्याचा निर्णय घेतला आणि मी सुरुवातीच्या ठिकाणाहून दादर ला बसमध्ये चढण्याचे ठरविले.
    
     १६ डिसेंबरला मी दादरला पोहोचलो जिथे ट्रेक लीडर स्नेहा आणि इतर सहभागी आधीच उपस्थित होते. इतर सहभागींची वाट पाहत असताना, सुमारे रात्रि ९:४५ ला, मला विनायकचा फोन आला की तो ठाणे रेल्वे स्थानकावर आहे आणि हार्बर मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मी ट्रेक लीडरला कळवले आणि तिने फास्ट ट्रेनने दादरला येण्याचा सल्ला दिला, विनायक रात्री १०:२५ च्या सुमारास दादरला पोहोचला. रात्री १०:३० च्या सुमारास आम्ही प्रवासाला सुरुवात केली. अमेयने त्याचे सध्याचे लोकेशन शेअर केले, पण जेव्हा आम्ही नेरुळ एल. पी. ला पोहोचलो तेव्हा बस ड्रायव्हरने फ्लायओव्हरचा रस्ता धरला आणि आम्ही ३ किमी पुढे पोहोचलो. आम्हाला निघायला आधीच ३० मिनिटे उशीर झाला होता आणि आता पुन्हा सुमारे ३० मिनिटे थांबावे लागणार होते. द्रुतगति मार्ग असल्या कोणती ही वाहने थांबत नव्हती, ३ किलोमीटर पायी चालत येण्या पलीकडे पर्यां नव्हता, तो ३ किलोमीटर चालत रात्रि १:०० च्या सुमारास बस जवळ पहोचला. आम्ही पुढे निघालो आणि कामोठे येथे आणखी एक टीम लीडर विकास दुतल आमच्यात सामील झाला.

     पहाटे ५:०० च्या सुमारास आम्ही मुरुड समुद्रकिनारी पोहोचलो, बसमध्ये विसावलो आणि ७:०० च्या सुमारास "पानवलकर खानावळ" नावाच्या जवळच्या खानावळीत नाश्ता करायला निघालो. नाश्त्याला "कांदे पोहे आणि चहा" होता, चविष्ट कांदे पोह्यांवर ताव मारून झाल्यावर आम्ही पुन्हा बस जवळ परतलो. टीम लीडर विकासने सहभागींना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या त्यानंतर आम्ही सर्वांनी आपली ओळख करून दिली आणि समुद्रकिनाऱ्यावर निघालो. सर्वजण पद्मदुर्ग किल्ल्यासाठी उत्सुक होते, पण बोट मालकाशी संपर्क होत नव्हता, अखेरीस बोट मालकाशी संपर्क झाला आणि ८:४० च्या सुमारास बोट आली. आम्ही आमचे शूज काढले आणि आमची जीन्स ओली होऊ नये म्हणून दुमडली तसेच बोटीला धक्का देऊन बोट वळवण्यास खलाशीला मदत केली, त्यानंतर आम्ही सकाळी ८:५५ च्या सुमारास बोटीमध्ये बसलो आणि पद्मदुर्ग किल्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.

मुरड समुद्र किनारा
मुरड समुद्र किनारा 
किल्ले पद्मदुर्ग
किल्ले पद्मदुर्ग
    जसजसे पुढे जात होतो तसतसा किल्ला जवळ येत होता आणि पद्मदुर्ग किल्याचे आकर्षण अधिक वाढत होते. सगळ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, १० मिनिटात आम्ही गडाच्या किनारी पोहोचलो. आम्ही बोटीतून गुडघाभर पाण्यात उतरलो होतो. खडकांवर शेवाळ असल्या कारणाने निसरडे झाले होते, तसेच खडकांवर तयार झालेल्या कालव्यांमुळे अजूनच सावध पणे चालावे लागत होते. चुकून जरी तोल गेला आणि कालव्यांवर पडलो तर वस्तर्या प्रमाणे शरीरावर घाव होणार हे निश्चित होते. आम्ही सर्व काळजीपूर्वक खडकांवरून चालत कोरड्या जागी पोहोचलो. आम्ही शूज घातले आणि किल्ला पाहू लागलो. टीम लीडर विकास याने किल्ल्याची रचना समजावून सांगायला सुरुवात केली आणि एका ठिकाणी त्याने बोट दाखवून सांगितले "चमत्कार/इंजिनियरिंग मार्वल" सुरुवातीला आम्हाला, त्याला काय म्हणायचे आहे ते समजले नाही, परंतु लवकरच त्याने स्पष्ट केले की, किल्ला ३५० ते ४०० वर्षांपूर्वी बांधला होता, आजवर समुद्राच्या लाटा त्यावर धडकत आहेत, या लाटांच्या धडकाने, तटातील दगडांची झीज झाली, पण दोन दगडांना जोडणाऱ्या पदार्थावर मात्र काहीच परिणाम झाला नाही, ते जसेच्या तशेच आहे! म्हणजेच ३५० ते ४०० वर्षांपूर्वी उत्कुष्ट दर्जाचे दगडांना जोडणारे पदार्थ (बॉण्डिंग मटेरियल) तयार केलं जायायचे. आजच्या पिडीला मात्र ते अवगत नाही! 

प्रचीन तंत्रज्ञानाचा चमत्कार, समुद्री लाटांचा माऱ्याने दगडाची झीज झाली पण बॉण्डिंग मटेरियल वर कोणताही परिणाम झाला नाही
प्रचीन तंत्रज्ञानाचा चमत्कार, समुद्री लाटांचा माऱ्याने दगडाची झीज झाली
पण बॉण्डिंग मटेरियल वर कोणताही परिणाम झाला नाही
    आम्ही पुढे गेलो आणि प्रथम, "पडकोट" पाहायला सुरवात केली, कस्टम आणि पुरातत्व विभागाच्या निष्काळजीपणामुळे तटबंदी ढासळली आहे, तसेच अनेक प्राचीन तोफा जमिनीवर तुटलेल्या अवस्तेत पाहून दुःख झाले. तोफा उचलून चांगल्या जागी ठेवावे वर इतर काही दुरुस्तीचे काम करायचे तर पुरातत्व विभागाची परवानगी लागते, नाहीतर दंडात्मक कार्यवाही ला सामोरे जावे लागते. पुरातत्व विभाग स्वत काही करत नाही आणि दुसऱ्यांना काही करू देत नाही.  पडकोट पाहून झाल्यावर आम्ही मुख्य दरवाजातून गडाच्या आत जायचे ठरवले, प्रत्येक पायरी चढताना माझी छाती अभिमानाने फुलून गेली. नतमस्तक होत किल्ल्याच्या आत गेल्यावर डावीकडे काही अवशेषांनी आमचे लक्ष वेधून घेतले, ह्या वास्तू म्हणजे घोड्यांच्या पागा असे काही संकेतस्थळांवर नमूद केले आहे, पण सागरी किल्ल्यावर घोड्यांचा उपयोग काय? त्या संरचना सैनिकांच्या खोल्यांसारख्या आहेत किंवा इतर कारणांसाठी वापरल्या जाऊ शकतात परंतु घोड्यांची पागा नाहीत हे निश्चित, असे टीम लीडर विकास दूतल याने ठामपणे सांगितले. आम्ही पुढे सरकलो आणि कंडेश्वरी देवीच्या मंदिरात पोहोचलो, देवीचे मंदिर हे भग्न अवस्तेत आहे, व मंदिरात देवीची मूर्ती नाही. स्थानिकांनीं एका पाषाणावर देवीचे चित्र काढलेले आहे. मंदिर पाहून झाल्यावर आमच्या निदर्शनास सिमेंटचा लेप असलेली काही खोलीसारखी रचना दिसली; टीम लीडरने आम्हाला सांगितले की ही वास्तू कस्टम अधिकाऱ्यांनी बांधली आहे कारण हा किल्ला पूर्वी कस्टम अधिकाऱ्यांच्या वापरात होता. पुढे निघालो आणि कातळात बांधलेली पाण्याची मोठी टाकी समोर दिसली, सध्या पाणी पिण्यायोग्य नाही, पण सुरुवातीच्या काळात गडावर पाण्याचा स्रोत किंवा विहीर नसल्याने पावसाचे पाणी साठवून ते वर्षभर वापरायचे.

पद्मदुर्ग केल्या वरील अवशेष व पाण्याचे टाके
पद्मदुर्ग केल्या वरील अवशेष व पाण्याचे टाके
कंडेश्वरी देवीचे पडके मंदिर
कंडेश्वरी देवीचे पडके मंदिर
    आम्ही पुढे निघालो आणि तटबंदीच्या पायऱ्या चढून तटबंदीवर चालू लागलो. ही लादनि (भिंत) साधारण ४ ते ५ फूट रुंद आहे. तटबंदीवरून जंजिरा किल्ला दिसतो, किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी बुरुजावर अनेक तोफा आहेत, पण त्यातली एक तोफ हे तोफगाड्यावर ठेवल्या मुळे आकर्षक दिसते. मार जंग्यातून पहिले तर, जणू ही तोफ जंजिऱ्यावर निशाणा साधत आहे असे भासते! तसेच गडावर प्राचीन "सौच कुप" (प्रसाधनगृहांची) व्यवस्था पाहावयास मिळते. काही ज्ञानी लोकांच्या म्हणण्या नुसार प्रसाधन गृहाची पद्धत ही इंग्रजांनी भारतात आणली, पण हे सपशेल खोटे आहे, याला इंग्रजांचे उदादिकारण करणे असे म्हणणे योग्य ठरेल. मराठ्यांच्या गडकिल्ल्यांवर विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज्यांनी बांधलेल्या किल्ल्यांवर प्रसाधन गृहाची वेवस्था प्रामुख्याने पाहायला मिळते.  म्हणजे ३५० ते ४०० वर्षां पूर्वी मल निसरा योग्य पद्धतीने केला जात असे, आणि आज भारत सरकार ला या साठी योजना आखाव्या लागत आहेत! प्रातरविधींसाठी टॉयलेट चा वापर करा, उघड्यावर बसू नका वगैरे हे जाणतेला सांगावे लागते हे भारताचे दुर्दैव!
   
     आमचा किल्ला पाहण्यात आणि प्राचीन बांधकाम व तंत्रज्ञानावर चर्चा करण्यात सुमारे ९० मिनिटे कशी गेली हे कळलेच नाही. परतीच्या प्रवासासाठी तीच बोट गडाच्या किनारी उभी होती, सर्वांना बोलावणे आले, आम्हाला गडावर अजून वेळ घालवायचा होता, पण अजून दोन किल्ले बघायचे होते म्हणून आम्ही बोटीत बसलो आणि १० मिनिटात सकाळी १०:४० च्या सुमारास समुद्र किनारी पोहोचलो.

पदमदुर्ग गडावरील काही वास्तू
पदमदुर्ग गडावरील काही वास्तू 
पदमदुर्ग गडावरील तोफ आणि जंजिरा किल्ला
पदमदुर्ग गडावरील तोफ आणि जंजिरा किल्ला 
    समुद्र किनाऱ्यावर पे अँड यूज टॉयलेट उपलब्ध असल्याने तिथे फ्रेश झालो आणि सामराजगड ट्रेकसाठी सज्ज झालो. एक आश्चर्यकारक गोष्ट आम्ही पाहिली, स्थानिक लोकांना सामराजगड विषयी काहीच माहित नाही ! आम्ही बसमध्ये चढलो आणि सामराजगडासाठी निघालो, गुगल मॅपच्या मदतीने आम्ही सामराजगडाच्या पायथ्याशी पोहोचलो, शिवमंदिराच्या बाजूने साम्राजगडाकडे वाट जाते हे ठाऊक होते, म्हणून आम्ही स्थानीकांना शिवमंदिराची वाट विचारली, त्यांनी जी वाट दाखवली त्या वाटेने आम्ही काही अंतर पुढे गेलो व ती पायवाट पुसत होऊ लागली, अंदाज आला होता कि आम्ही वाट चुलको आहे तसेच स्थानिकांनी ही आमची दिशा भूल केली होती. टीम लीडर विकास ने सर्वाना जिते आहेत तिथे थांबायला सांगितले आणि ते योग्य रस्ता शोधण्या करीत पुढे गेले, काही वेळाने समूहातील एकाला योग्य रस्ता सापडला व आम्ही सर्व त्या शिवमंदिर पाशी पोहचलो, फोन करून विकासलाही कळविले होते. गडावर किव्हा गडाच्या पायथ्याशी कोणती ही मार्ग दर्शिका लावलेली नाही, त्या मुळे वाट चुकणे स्वाभाविक होते.

साम्राजगाच्या पायथ्याशी पूर्वेकडील बाजूस नवी बनविलेल्या पायऱ्या
साम्राजगाच्या पायथ्याशी पूर्वेकडील बाजूस नवी बनविलेल्या पायऱ्या
साम्राजगडावरी एका वास्तूच्या खांबांचा अवशेष
साम्राजगडावरी एका वास्तूच्या खांबांचा अवशेष
    टेकडीची उंची जास्त नव्हती, पण दुपारची वेळ होती, त्यामुळे जरा दमलो होतो. २० मिनिटात आम्ही गडाच्या तटबंदी जवळ पोहोचलो, गडावरील आणखी अवशेष शोधण्याचा प्रयत्न केला, पण काहीही मिळाले नाही. खात्रीशीर सांगता येत नाही पण पुरातत्व विभागाने उत्खनन केले तर अवशेष सापडतील. येथे फक्त तटबंदी, ध्वजस्तंभ आणि मंदिराचा एक तुटलेला खांब उपलब्ध आहे. पुरातत्व विभागाने उत्खनन कार्य केले तर आणखी अवशेष सापडतील आणि किल्ल्याचा अधिक इतिहास जाणून घेण्यास मदत होईल. आम्ही सर्वजण तटबंदीवर बसलो आणि टीम लीडर विकास ने, सिद्धी आणि मराठा यांच्यातील ऐतिहासिक लढायांसह किल्ल्याची माहिती दिली. किल्ल्या विषयी माहिती ऐकून झाल्यावर आम्ही गड उताराला सुरवात केली, प्रचंड भूक लागली होती.

    आम्ही गड उतरून बसमध्ये चढलो आणि "पानवलकर खानावळ" ला जेवायला गेलो. व्हेज आणि नॉनव्हेज लंचचा पर्याय होता, आम्ही व्हेज लंचची ऑर्डर दिली, स्वादिष्ट भोजन करून झाल्यावर आम्ही विकास बरोबर चर्चा करून सोलकडी मागवली, एक एक प्याला सोलकडी पियुन आम्ही तृप्त झालो आणि रेवदंड्या किल्ला पाहण्यासाठी सज्ज झालो. दुपारी दीडच्या सुमारास आम्ही रेवदंडा किल्ल्याकडे निघालो आणि ९० मिनिटात दुपारी ३:०० वा. आम्ही रेवदंडा किल्ल्यावर पोहोचलो, तिथे टीम लीडरने बस पार्किंगसाठी १५० रुपये दिले. आम्ही आवारात प्रवेश केला आणि चार मजली इमारतींच्या अवशेषांनी आमचे लक्ष वेधून घेतले. इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी टीम लीडर विकासने आम्हाला किल्ल्याचा इतिहास आणि महत्त्व सांगितले. इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर जुन्या तोफा ठेवल्या आहेत, तोफा चांगल्या स्थितीत आहेत. आम्ही इमारती मध्ये शिरलो पण इमारत पूर्णपणे पोकळ होती, इमारतीच्या वरच्या मजल्यावर मधमाश्याचे पोळे होते, त्यामुळे त्यांना त्रास न देता आम्ही बाहेर पडलो. एक ग्रुप फोटो काढला आणि सर्व जण रेवदंडा समुद्र किनारी गेलो, समुद्र किनारा सुंदर आणि स्वच्छ आहे. आम्ही समुद्रकिनाऱ्यावर थोडा वेळ घालवला आणि समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना तटबंदीवरील "शरब" या पौराणिक प्राण्याचे शिल्प निदर्शनास पडले. सहसा, हे शिल्प पोर्तुगीज किल्ल्यांवर पाहावयास मिळत नाही, तर हे शीलप हिंदू किल्ल्यावर पाहिले जाते. १७४० मध्ये मराठ्यांनी किल्ला ताब्यात घेतला तेव्हा हे शिल्प तटबंदी वर लावले असावे असा अंदाज आहे. 

रेवदंडा गडावरील चार मजली इमारत
रेवदंडा गडावरील चार मजली इमारत
रेवदंडा गडावरील चार मजली इमारतीतील आतील बाजू
रेवदंडा गडावरील चार मजली इमारतीतील आतील बाजू
रेवदंडा गडाच्या तटबंदीवर शरबाचे शिल्प
रेवदंडा गडाच्या तटबंदीवर शरबाचे शिल्प
समुद्रकिनाऱ्यावर थोडा वेळ घालवल्यानंतर आणखी एक सुंदर ग्रुप फोटो काढला व सायंकाळी ५:०० च्या सुमारास आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. परतताना चहासाठी मुंबई-गोवा महामार्गावर ३० मिनिटांचा थांबा घेतला आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरवात केली. प्रत्येक सदस्याला त्यांच्या जवळच्या रेलवे स्थानकाजवळ सोडत आम्ही रात्री १०:०० च्या सुमारास दादर स्टेशनवर पोहोचलो.

     सुंदर आणि अविस्मरणीय सहलीसाठी "डोंगर यात्रा" ग्रुपचे आभार आणि किल्ल्यांबद्दल अमूल्य माहिती दिल्याबद्दल टीम लीडर विकास दुतल यांचे विशेष आभार!

पद्मदुर्गाचे प्रवेश द्वार
पद्मदुर्गाचे प्रवेश द्वार
पद्मदुर्गावरील ग्रुप फोटो
पद्मदुर्गावरील ग्रुप फोटो 
शिवमंदिर जिथून साम्राजगडाकडे वाट जाते
शिवमंदिर जिथून साम्राजगडाकडे वाट जाते
रेवदंड्यावरील ग्रुप फोटो
रेवदंड्यावरील ग्रुप फोटो 
ग्रुप फोटो
ग्रुप फोटो
ग्रुप फोटो
ग्रुप फोटो




कोरीगड - अनपेक्षित ट्रेक

 

प्रवासाची तारीख: २८ नोव्हेंबर २०२३ 
वाहतुकीची पद्धत : ट्रेन आणि बस



किल्ल्याचा इतिहास


  • सन १४८२ पासून हा किल्ला महंमदशाह बहामनीच्या ताब्यात होता, सन १४९० मध्ये अहमद हसनने बहामनींचा विश्वासघात करून निजामशाहीचे नवीन साम्राज्य स्थापन केले आणि कोरीगड किल्ला ताब्यात घेतला आणि सन १६३६ (१४६ वर्षे) पर्यंत निजामशाहीच्या ताब्यात होता. 
  • १६३६ मध्ये सम्राट शहाजान याने निजामशाहीवर हल्ला करून निजामाला हरवून सर्व प्रदेश ताब्यात घेतला, आदिलशाह आणि शहाजान यांच्यात झालेल्या तहात कोरीगड किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. 
  • १६४७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दादोजी कोंडदेव आणि ढमाले देशमुख यांच्या मदतीने किल्ला ताब्यात घेतला. 
  • १६६५ मध्ये पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी कुवरी/कोरीगडसह इतर २१ किल्ले मुघलांच्या ताब्यात दिले. 
  • औरंगजेबाने १६८९ मध्ये दख्खनवर स्वारी केली, मराठा साम्राज्याचे दुसरे राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर, १२ नोव्हेंबर १६९५ रोजी मुघलांनी कोरीगड किल्ला ताब्यात घेतला. 
  • सचिव शंकरजी नारायण यांनी नवजी बलकवडे यांना किल्ला पुन्हा ताब्यात घेण्याचा आदेश दिला, डिसेंबर 1695 रोजी नवजी बलकवडे यशस्वी झाले आणि त्यांनी कोरीगड किल्ला स्वराज्यात परत आणला - मराठा साम्राज्यात, परंतु बाळोजी नाईक ढमाले यांच्यासह अनेक सैनिकांचे प्राण गेले. 
  • कोरीगड किल्ला १८१८ पर्यंत १२३ वर्षे मराठा साम्राज्याच्या ताब्यात होता. 
  • सन १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने किल्ल्यावर ३ दिवस (११ ते १३ मार्च १८१८) गोळीबार केला तरीही त्याला यश आले नाही. शेवटी, १४ मार्च १८१८ रोजी, कर्नल प्रॉथरने दारूगोळा कोठारावर तोफ गोळा मारून यश मिळवले. गडावरील मराठा सैन्याने शरणागती पत्करून किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दिला. 
  •  कर्नल प्रॉथरने यांनी किल्ला लुटला, पण त्यांनी कोराई देवीच्या दागिन्यांना हात लावला नाही, त्याऐवजी त्यांनी कोराई देवीचे दागिने मुंबईच्या मुंबादेवी मंदिरात हस्तांतरित केले आणि ते दागिने आजही मुंबादेवी  मंदिरात आहेत.




कोरीगड विस्तीर्ण पठार
कोरीगड विस्तीर्ण पठार


सार्वजनिक वाहतुकीने कसे पोहोचायचे

  • पहाटे ५:४० ची इंद्रायणी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून पकडावी. 
  • राज्य परिवाहन बस लोणावळा बस डेपो येथून सकाळी ९.०० वाजता पेठ शहापूरसाठी निघते. (लोणावळा - भांबर्डे बस) 
  • हीच बस २:३० ते ३:०० च्या दरम्यान पेठ शहापूर पायथ्याला परत येते. (फक्त एक बस).
  • जर तुम्ही इंद्रायणी एक्सप्रेस चुकवली तर तुम्हाला लोणावळ - भांबुर्डे राज्य परिवाहन बस मिळणार नाही, पेठ शहापूर गावासाठी ही दिवसातील एकमेव बस आहे. जर तुमची बस चुकली तर तुम्ही खाजगी जीपने प्रवास करू शकता, त्याकरिता तुम्हाला पश्चिमेस जावे लागेल.  ज्याची किंमत अंदाजे मानसी ५० ते १०० आहे. 
  • त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासासाठी बस चुकवू नका जी पेठ शहापूर येथे दुपारी २:३० ते ३:०० वाजता येते. परत येत असताना, एकदा तुम्ही लोणावळ्याला पोहोचलात की तुम्ही मुंबईला जाण्यासाठी दुसरा पर्याय निवडू शकता. लोणावळा एम.एस.आ.र.टी.सी बस आगारातून खोपोली बस डेपोला जाण्यासाठी बस पकडा. (प्रत्येक १५-३० मिनिटांनी बसेस उपलब्ध आहेत).
  • खोपोलीहून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेनने मुंबईला जाऊ शकता. (एम-इंडिकेटर ॲपमध्ये खोपोली - सीएसएमटी ट्रेनच्या वेळा तपासा आणि त्यानुसार नियोजन करा) 


प्रवास आणि ट्रेकचा अनुभव


    हरिश्चंद्रगडाला भेट देण्याचा आणि मुक्काम करण्याचा प्लॅन होता, पण अनपेक्षित पावसामुळे आम्ही तो प्लॅन रद्द करून कोरीगडावर जाण्याचा निर्णय घेतला. मी स्व, लतेश आणि विलास काका, आम्ही पहाटे गोरेगावहून सकाळी साडेचार वाजता बेस्टच्या बसमध्ये बसून गोरेगाव स्टेशनला पोहोचलो आणि पहाटे ४:४९ च्या सुमारास चर्चगेट ट्रेनमध्ये चढलो. ५:२५ च्या सुमारास दादर स्टेशनला पोहोचलो. दादर मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून सकाळी ५:५१ वाजता इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये चढलो (आरक्षण केले नव्हते, त्यामुळे जनरल डब्यातून प्रवास केला). सुदैवाने लतेशला एक रिकामी सीट मिळाली, मग काय आम्ही तिघांनी पाळी पाळी ने बसून लोणावळा पर्यंत प्रवास केला. 
टीप: तुम्ही सीएसएमटीहून इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये चढू शकता, आमच्या बाबतीत आम्हाला थोडा उशीर झाला होता, ट्रेन चुकण्याची शक्यता जास्त होती; म्हणून दादरहून चढायचे ठरवले.

    सकाळी ८:२० च्या सुमारास आम्ही लोणावळा स्थानकावर पोहोचलो, आम्ही स्टेशनच्या पूर्वेकडून बाहेर आलो आणि गूगल मॅपच्या मदतीने एम.एस.आर.टी.सी बस डेपोच्या दिशेने चालत गेलो, बस डेपो रेल्वे स्थानकापासून ६०० मीटर अंतरावर आहे, चालत पोहोचायला ८ ते १० मिनिटे लागली. डेपोमध्ये चौकशी काउंटरवर, आम्ही पेठ शहापूरच्या बसच्या वेळेची चौकशी केली, बस सकाळी ९:०० च्या सुमारास निघेल असे सांगितले, आमच्या कडे ३० मिनिटे होती, म्हणून नाश्ता करण्याचे ठरवले. बस डेपोच्या बाहेर,  डाव्या बाजूला जिथून बसेस आत शिरल्या, तिथे नाश्त्याचा एक स्टॉल होता. प्रथम, आम्ही स्वच्छता सुनिश्चित केली आणि नाश्ता करण्याचे ठरवतो. आम्ही प्रत्येकी एक प्लेट मेदुवडा आणि चहा घेतला, नाश्ता करून आम्ही डेपोच्या आत गेलो आणि दुकानात पेठ शाहपूर (ॲम्बी व्हॅली) बसची चौकशी केली. दुकान मालकाने समोर उभ्या असलेल्या बसकडे बोट दाखवले, बसचा मार्ग होता "लोणावळा ते भांबुर्डे" बस जवळजवळ भरली होती, आणि आम्हाला शेवटच्या जागा मिळाल्या.

राज्य परिवहन बस - पेठ शाहपू करिता
राज्य परिवहन बस - पेठ शाहपू करिता

    सकाळी ९:०० वाजता बस वेळेवर निघाली आणि ९:४१ ला पायथ्याचे गाव पेठ शहापूर येथे पोहोचली, मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूने कोरीगड किल्ल्याकडे जाणारी वाट होती त्यामुळे आम्ही चालायला सुरुवात केली, पण सध्याचा मार्ग सर्वात लांब असल्याने गावातील एका वृद्ध काकांनी आम्हाला दुसरा मार्ग घेण्याचे मार्गदर्शन केले. आम्ही मागे वळून मुख्य रस्ता धरला आणि पुढे निघालो, रस्त्याने उजवे वळण घेतल्यावर आम्ही रस्ता सोडला आणि डोंगराकडे निघालो आणि योग्य ट्रेक मार्गाची खात्री करण्यासाठी आम्ही दुर्ग नेव्हिगेशन ॲपची मदत घेतली (आधीच ऑफलाइन नकाशा डाउनलोड केला होता) . ऑफलाइन नकाशाच्या साहाय्याने आम्ही पुढे गेलो, साधारणपणे, ट्रेकचा मार्ग सोपा आणि सुरक्षित असल्याने नकाशाची गरज नसते, परंतु ट्रेकच्या सुरुवातीला दोन उजवे वळण होते जिथे बहुतांश मंडळी चुकतात आणि सरळ चालत पुढे जातात, म्हणून सुरुवातीच्या स्तरावर आम्ही ऑफलाइन नकाशा वापरला. पायथ्याच्या गावातून तटबंदी व बुरुजावर फडकणारा भगवा ध्वज दिसत होता.







    आम्ही गडाच्या पायर्यानं जवळ आलो, त्यामुळे नेव्हिगेशन ॲप बंद केले आणि हरवण्याची भीती न बाळगता पुढे निघालो. ३० ते ४० मिनिटांच्या चढाईनंतर आम्ही गणेश गुंफा आणि गणपतीच्या छोट्या मंदिरात पोहोचलो. गुहेत किमान १० ते १२ लोकांना राहता येते, परंतु सध्या गुहा अस्वच्छ असून वटवाघळांचे घर बनले आहे. ५ मिनिटे विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो.

श्री गणेश मंदिर आणि लेणी
श्री गणेश मंदिर आणि लेणी 

    १० मिनिटे चालल्यानंतर आम्ही आणखी एका गुहे जवळ आलो, जिथे गुहेच्या आत पाण्याची टाकी होती. पाण्याच्या टाकीतील पाणी स्वच्छ आणि पिण्यास सुरक्षित आहे याची खात्री नव्हती, म्हणून बाटल्या पुन्हा भरणे टाळले आणि पुढे निघालो. साधारण सकाळी ११:१५ च्या सुमारास, ९० मिनिटात आम्ही गडाच्या मुख्य दरवाजा "गणेश दरवाजा" जवळ पोहोचलो. डाव्या बाजूच्या भिंतीवर माणसाच्या चेहऱ्याचे एक कोरीवकाम होते, ते भगवान भैरोबाचे किव्हा मिशीवाल्या हनुमानाचे असावे, सध्या फक्त मुख शिल्लक असल्याने ओळखणे कठीण आहे. दरवाज्याची पुनर्बांधणी नुकतीच एका खाजगी संवर्धन संस्थेने केली असून नवीन लाकडी दरवाजे बसवले आहेत. भारतीय परताव खात्याकडून अशा चांगल्या कामाची अपेक्षा करू नका. आम्ही दरवाज्यातून पुढे निघालो, दरवाज्याच्या मागे उजव्या बाजूला, नेहमीप्रमाणे झोपडीच्या आकाराची रचना, द्वारपालांसाठी केलेली तरतूद होती आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी एका छोट्या पन्हळाची देखील लक्षवेधी रचना होती. पुढे निघालो आणि अजून दोन पाण्याच्या टाक्या समोर आल्या. एक दरवाजाच्या डाव्या बाजूला आहे आणि दुसरा दरवाजाच्या अगदी समोर आहे. डावीकडे पायऱ्या चढून गडाच्या माथ्यावर पोहोचलो.

भैरवनाथ किव्हा हनुमानाचे शिल्प
भैरवनाथ किव्हा हनुमानाचे शिल्प

    समोरच शिवमंदिर होते, तिथे चार तोफा ठेवल्या होत्या. प्रथम, आम्ही किल्ल्याच्या उजव्या बाजूची भ्रमंती करण्याची ठरविले. म्हणून शिव मंदिरात न जात, आम्ही पुढे सरोवराकडे निघालो, दोन तलावांच्या मध्ये एक वाट होती तिथे बसण्याची व्यवस्था केली होती. तलावात आंघोळ करण्याचा आमचा बेत होता, पण पाणी शुद्ध नव्हते, म्हणून आम्ही तो बेत रद्द करून पुढे निघालो आणि गडाच्या विरुद्ध दिशेला पोहोचलो. आम्ही तटबंदीवरून चालायला सुरुवात केली आणि गडाच्या उत्तरेकडील एका बुरुजावर पोहोचलो, ज्याला फ्लॅग पॉइंट  देखील म्हणतात, तिथे भगवा ध्वज अभिमानाने फडकत होता. हा तोच ध्वज आणि बुरुज होता जो मी आधी सांगितल्याप्रमाणे पायथ्याच्या गावातून दिसत होता.


समूह फोटो (विलास काका, लतेश दादा आणि मी)
समूह फोटो (विलास काका, लतेश दादा आणि मी) 

आम्ही सुमारे १५ ते २० मिनिटे घालवली, आणि आम्ही पुढे जाण्यापूर्वी नाश्ता केला; आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाला भेटलो, ज्यांनी त्यांचा साल्हेर किल्ल्याचा ट्रेकिंगचा अनुभव शेअर केला. इन्स्टा आयडी शेअर केल्यावर, आम्ही तटबंदीवरून पुढे निघालो आणि शिव मंदिरासमोरील भिंतीवरून खाली उतरलो, शिव मंदिराच्या आवारातील चार तोफा पहिल्या आणि मंदिरात प्रवेश करून महादेवाचे दर्शन घेतले त्यानंतर विष्णू मंदिराच्या दिशेने पुढे निघालो. विष्णू मंदिरासमोर अनेक वीरगळे ठेवली होती. वीरगळ हा वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारलेला स्तंभ (सामान्यतः दगड किंवा लाकडाचा) असतो. त्याला वीरस्तंभ असेही म्हणतात.

श्री शिव मंदिर
श्री शिव मंदिर 

श्री विष्णू मंदिर
श्री विष्णू मंदिर

वीरगळ
वीरगळ

वीरगळ
वीरगळ

    विष्णू मंदिरात पाहून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. कोराई देवीच्या मंदिराकडे चालत असताना आम्हाला एक मोठी तोफ दिसली, तोफे कडे न जात प्रथम आम्ही कोराई देवीच्या मंदिरात गेलो, मंदिरा बाहेर दीपमाळ आहे. मंदिर नव्यानं बांधलेले आहे. मंदिराच्या आत जाऊन कोराई मातेचे दर्शन घेतले. कोराई मातेची काळ्या पाषाणातील मूर्ती फार सुरन्दर आहे. मंदिरात १० - १५ मिनिटे आराम करून आम्ही उर्वरित गड भ्रमंती साठी निघालो.

श्री कोराई देवी मंदिर
श्री कोराई देवी मंदिर

    देवीचे दर्शन घेऊन आम्ही गडावरील सर्वात मोठ्या तोफेपैकी एक असलेल्या लक्ष्मी नावाच्या तोफेकडे आलो. तोफ पाहून झाल्यावर, तटबंदीतून पुढे निघालो आणि दुपारी १२:०० च्या सुमारास किल्ल्याच्या दक्षिण बाजूला पोहोचलो. आम्ही तटबंदीवरून खाली आलो आणि हनुमान दरवाजा नावाच्या गडाच्या पश्चिम दरवाजाकडे जाणाऱ्या छोट्या दरीत पोहचलो. पश्चिम दरवाज्याच्या दिशेने जाताना अजून एक पाण्याचे टाके दिसले, पाणी पिण्या योग्य नव्हते. आम्ही पुढे सरकलो आणि दरवाज्यापाशी पोहोचलो. हनुमान दरवाजापासून वाट आंबवणे गावात जाते, पण सद्यस्तिथीत वाट सुरक्षित वाटत नसल्याने, खाली जाण्याचे टाळले.

लक्ष्मी तोफ
लक्ष्मी तोफ


    हनुमान दरवाज्याचा पाहून झाल्यानंतर, पुढे चालत एका लहानश्या रॉक पॅच चढत पुन्हा गड पठारावर आलो आणि खालच्या बुरुजाकडे (चिलखती बुरुज) जाणाऱ्या वाटेवर पोहोचलो. मार्ग चांगल्या स्थितीत नाही, म्हणून आम्ही खाली जाण्याचे टाळले. लक्ष्मी तोफेच्या आकाराची अजून एक तोफ तिथे होती. तटबंदीवरून ॲम्बी व्हॅली शहर आणि धावपट्टीचे दृश्य स्पष्टपणे दिसते. पुढे निघालो आणि गडाच्या दक्षिण बुरुजावर पोहोचलो. बुरुज सुस्तिथित आहे, पण झाडा-झुडुपांनी व्यापलेला आहे, साफ सफाई केल्यास बुरुजास मोकळा स्वास मिळेल. झुडुपांमध्ये सरपटणारे प्राणी असण्याच्या भीतीने आम्ही बुरुजावर जाणे टाळले.

चिलखती बुरुजाची आतील बाजू
चिलखती बुरुजाची आतील बाजू  

Front layer of Bastion
चिलखती बुरुजाची दर्शनी बाजू

    तटबंदीच्या पूर्वेकडून आम्ही मुख्य दरवाजाकडे (गणेश दरवाजा) पुढे निघालो. मुख्य गेटच्या दिशेने जात असताना काही कामगार जीर्णोद्धाराच्या कामासाठी छिन्नी आणि हातोड्याने दगड तासताना दिसले. आम्ही गडाच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलो तेथून दुपारी १:०० च्या सुमारास आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली, किल्ला उतरताना आम्हाला ७ ते ८ वर्षे वयोगटातील लहान मुले दिसली. पुण्यातील एका शाळेने त्यांच्यासाठी सहलीची व्यवस्था केली होती, एका ऐतिहासिक ठिकाणी सहलीचे आयोजन करण्याचा शाळेचा एक चांगला उपक्रम होता.

    आम्ही गणेश गुहेत ५ मिनिटे विश्रांती घेतली आणि ३० मिनिटांत दुपारी दीड वाजता पुढे निघालो. आम्ही पायथ्याला पेठ शहापूर गावात पोहोचलो. आम्हाला MSRTC बससाठी एक ते दीड तास वाट पाहावी लागणार होती, पण सुदैवाने एक खाजगी वाहन आले, आम्ही त्याला लोणावळा स्टेशन जवळ सोडण्यास सांगितले; प्रति व्यक्ती ५० रुपये आकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सहमत झाल्याने आम्हाला प्रति व्यक्ती १५ रुपये जादा खर्च करावे लागतील, यामुळे आमचा वेळ वाचणार होता. दुपारी १:५० च्या सुमारास लोणावळा स्टेशनला पोहोचलो. त्यांनी आम्हाला लोणावळा पश्चिम, शिवाजी चौक येथे सोडले, तेथून आम्ही ओव्हरहेड ब्रिजचा वापर करून पूर्वेला आलो आणि पुन्हा ८ ते १० मिनिटे चालत बस डेपोत पोहचलो.

     आम्ही चौकशी कक्षेत खोपोली बस करीत चौकशी केली असता, ३:०० आणि ३:३० वाजताची बस असल्याचे सांगितले. आमच्या हातात जवळ जवळ एक तास होता, त्यामुळे खरेदीला जायचे आणि जेवण करायचे ठरवले. बसस्थानकाच्या अगदी विरुद्ध दिशेला मगनलाल चिक्कीचं दुकान होतं, तिथे विविध प्रकारच्या चिक्की मिळतात. चिक्की विकत घेतल्यानंतर जेवणासाठी रेस्टॉरंट शोधत आहोत, पण रेस्टॉरंट कम ढाब्याची स्थिती चांगली नव्हती, त्यामुळे जेवण करणे टाळून बस डेपोत परत आलो, उसाचा रस पियुन स्टँडवर गेलो, जिथे जुन्नरची-पनवेल अशी एक बस आली. आम्ही बसमध्ये चढलो, बस दुपारी ३:३० वाजता निघाली. आणि दुपारी ३:४० च्या सुमारास आम्ही खोपोली फाट्यावर पोहोचलो.  खोपोली फाटा बसस्थानकापासून खोपोली रेल्वे स्टेशन ३ किमी अंतरावर होते. २० रुपये प्रति व्यक्ती या दराने शेअरिंग ऑटो उपलब्ध आहेत, परंतु आमच्याकडे पुरेसा वेळ होता आणि आमचा चालण्याचा कोटा अद्याप पूर्ण झाला नव्हता म्हणून आम्ही चालत अंतर कापायचे ठरवले 😀. 

गूगल मॅप्सच्या मदतीने, ४:२० च्या सुमारास, आम्ही खोपोली रेल्वे स्थानकाजवळ पोहोचलो, ट्रेन आधीच फलाटावर लागली होती , मर्यादित फ्रिक्वेन्सीमुळे ट्रेन जवळजवळ भरली होती, नशिबाने आम्हाला बसायला जागा मिळाली. सायंकाळी साडेचार वाजता ट्रेन सुटली आणि संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास दादरला पोहोचलो. (आम्ही ज्या डेक्कन एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा विचार करत होतो, तिला ४० मिनिटे उशीर झाला होता). साधारण सायंकाळी ७:१५ च्या सुमारास आम्ही गोरेगावला पोहोचलो.


जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे 

घनगड किल्ला 
मोरगिरी किल्ला 
तैल बैला
तुंग तिकोना किल्ला 
डायनासोर पार्क 
मेण संग्रहालय


खर्चाचा तपशील (जेवण आणि नाश्ता वगळून)

खर्चाचा तपशील (जेवण आणि नाश्ता वगळून)


वेळेचा तपशील






छायाचित्रे   





हंपी टूर - दिवस ४ - दुर्ग कोप्पळ



प्रवास तारीख: २५ ऑक्टोबर २०२३ ते २९ ऑक्टोबर २०२३
वाहतुकीचे साधन: ट्रेन, बस आणि ऑटो




चौथा दिवस


    दोन दिवसांपासून आम्ही लवकर उठत होतो, म्हणून किमान १-२ तास उशिरा उठण्याचा निर्णय घेतला. आम्ही सकाळी ७:३० वाजता उठलो. ऑटोचालक श्री. परशुराम यांनी आम्हाला फोन केला आणि वेळ निश्चित केली. आम्ही त्यांना सकाळी ९:३० वाजता हॉटेल अमृता रेसिडेन्सीला येण्यास सांगितले. आम्ही तयार झालो आणि हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडलो. हॉटेलच्या गेटसमोर ऑटो उभी होती, पण परशुराम तिथे नव्हता. ऑटोचालकाने आम्हाला सांगितले की श्री. परशुराम दुसऱ्या कामात व्यस्त आहेत म्हणून त्यांनी त्यांना पाठवले. आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि ऑटोचालकाला रेस्टॉरंटमध्ये थांबण्यास सांगितले कारण आम्हाला नाश्ता करायचा होता. नाश्ता केल्यानंतर आम्ही कोप्पलकडे निघालो.



कोप्पळ मध्ये आम्ही पाहिलेली ठिकाणे


श्री गाविसिद्धेश्वर मठ
कोप्पल दुर्ग 
हुलिकेरी पार्क
हुलिगेम्मा देवी मंदिर
तुंगभद्रा धरण, होसापेते


👉 खर्चाचा तपशील




श्री गाविसिद्धेश्वर मठ



    होसापेटे ते कोप्पळ अंतर सुमारे ३१ किलोमीटर आहे. आम्ही सकाळी १०:२० वाजता गाविसिद्धेश्वर मठात पोहोचलो. आम्ही मठाच्या आवारात प्रवेश केला तेव्हा एका सुरक्षा रक्षकाने उजव्या बाजूच्या इमारतीकडे बोट दाखवत कन्नड भाषेत काहीतरी सांगितले. आम्ही इमारतीच्या उजव्या बाजूला गेलो जिथे बूट ठेवण्याची व्यवस्था होती आणि तिथे शौचालयाची व्यवस्था होती. आम्ही आमचे बूट गार्डला दिले आणि त्याच्याकडून टोकन घेतले. आम्ही पुढे गेलो आणि प्रवेशद्वारावर एक दगड शोपीस म्हणून ठेवला होता. पायऱ्या चढून पुढच्या मजल्यावर गेलो जिथे आम्हाला, लहान खिडकीसारख्या प्रवेशद्वारातून काही जण खोलीत जाताना दिसले. आम्ही अंदाज लावला कि हे मंदिर असावे आणि आतमध्ये कोणत्यातरी देवतेची मूर्ती असावी, म्हणून आम्ही देखील लहान प्रवेशद्वारातून प्रथम आमचा एक पाय आत घातला आणि हळूहळू आमचे शरीर आत ढककल्ले. आमचा अंदाज खरा ठरला होता, आतमध्ये शिवलिंग होते.. आम्ही आशीर्वाद घेतला आणि पुजाऱ्याने हातात तिकीट दिले. आम्हाला तिकिटाचा उद्देश माहित नव्हता, म्हणून आम्ही त्याला सांकेतिक भाषेत विचारले आणि त्याने उत्तर दिले " प्रसादम् ", ते जेवणाचे/दुपारच्या जेवणाचे तिकीट होते. आम्ही मंदिरातून आत शिरलो त्याच पद्धतीने विरुद्ध दिशेने बाहेर पडलो.


प्रवेशद्वारावर असलेले शोपीस दगड
प्रवेशद्वारावर असलेले शोपीस दगड

    मंदिरासमोर एक मोकळी जागा होती जिथे स्वामीजींचे आसन ठेवले होते. स्वामीजींच्या दोन मुर्त्या होत्या, आम्ही तिथे पाच मिनिटे घालवली आणि जवळी ठेवलेल्या टाकीतून एक ग्लास पण पियालो, विहिरीतील पाणी गोड होते, नंतर आम्ही बाहेर आलो आणि वरच्या मजल्यावर जाण्या करिता डावीकडे वळलो. तिथे आणखी एक मंदिर होते, तिथे स्वामीजी आणि इतर देवी देवतांच्या मुर्त्या होत्या आणि दुसरे मंदिर बांधले जात होते. वरून कोप्पळ गावाचे संपूर्ण दृश्य सुंदर दिसत होते. कोप्पळ किल्ला स्पष्ट दिसत होता आमचे पुढचे गंतव्य स्थान होते.


कोप्पळ गावाचे विहंगम दृश्य
कोप्पळ गावाचे विहंगम दृश्य

    आम्ही पहिल्या मजल्यावर आलो आणि तिथून आम्ही तळ्याकडे गेलो, तळ्याच्या मध्यभागी स्वामीजींचे आणखी एक मंदिर बांधलेले होते. काही भागात अजूनही बांधकाम सुरू होते, त्यामुळे आम्हाला उघड्या पायांनी चालणे कठीण जात होते. मंदिरातून परतताना आम्हाला एक स्वयंपाकघर दिसले जे कॅन्टीन किंवा लंच हॉलचे चिन्ह होते. आम्ही पुढे गेलो आणि मंदिरात आधी दिलेल्या काउंटरवर तिकिटे जमा केली. सकाळी ११:१० वाजले होते, जेवणासाठी खूप लवकर होते, म्हणून आम्ही प्रसाद म्हणून फक्त गोड (खीर) घेतली, प्रसाद घेतल्यानंतर आम्ही प्लेट्स धुवून वाळवण्यासाठी बाजूला ठेवल्या आणि पुढच्या गंतव्यस्थानासाठी निघालो. 👉पृष्ठाच्या सुरुवातीला जा



कोप्पळ दुर्ग


    सकाळी ११:२५ वाजता आम्ही कोप्पळ किल्ल्याकडे निघालो. गुगल मॅप्सच्या मदतीने आम्ही सकाळी ११:४० वाजता कोप्पळ किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. मराठ्यांच्या इतिहासात या किल्ल्याचे खूप महत्त्व आहे. मराठा सैन्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी दक्षिण दिग्विजय मोहिमे दरम्यान, मियाना बंधूंविरुद्धची लढाई जिंकली आणि गड ताब्यात घेतला. जेव्हा आम्ही गेटकडे गेलो तेव्हा सर्वत्र कचरा साचलेला दिसला, तसेच काही ठिकाणी स्थानिक लोक पायथ्याचा परिसर शौचालय म्हणून वापरत होते. या सर्व गोष्टी पाहून खूप निराश झालो. किल्ल्याचे आणि इतर प्राचीन ठिकाणांचे महत्त्व स्थानिक लोकांना माहित करून देणे खपू महत्वाचे आहे. आम्ही पुढे गेलो आणि किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. प्रवेशद्वार शाबूत आणि सुस्थितीत पाहून आम्ही थक्क झालो. आम्ही आनंदाने प्रवेश द्वारातून आत प्रवेश केला आणि वर जाण्याकरिता पायऱ्या चढू लागलो.
 
कोप्पळ किल्याचा मुख्य प्रवेशद्वार
कोप्पळ गडाचा मुख्य प्रवेशद्वार 


    अपेक्षेप्रमाणे पायऱ्या मोठ्या दगडांनी बनवलेल्या आहेत, पायऱ्या चढतेवेळी कसरत करावी लागत होती. आम्ही दुसऱ्या प्रवेशद्वारा जवळ पोहोचलो, जिथे अगदी विरुद्ध दिलशेला एक छोटा दरवाजा होता आणि खाली जाण्या करीत पायऱ्या होत्या, पण वाट गवतांनी व झुडपांनी आच्छादलेली होती, म्हणून तिथे जाणे टाळले, नंतर आम्हाला कळले की त्या जागी पाण्याचे मोठे टाके होते. देवाचे आभार की आमच्या तिघांपैकी कोणीही तिथे जाण्याचा प्रयत्न केला नाही! आम्ही दुसऱ्या दरवाजातून पुढे गेलो आणि दोन खांब असलेल्या लेणी समोर आलो. लेणी मोठी आहे, किमान १०-१५ लोक सहज सामावतील, परंतु सध्याची स्थिती राहण्या योग्य नाही, लेणी वटवाघळांनी व त्यांच्या विष्टेने भरलेली आहे.

कोप्पळ किल्ल्यावरील लेणी
कोप्पळ गडावरील लेणी

     लेणी पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि तिसऱ्या दरवाज्याजवळ पोहोचलो, त्या दरवाज्यातून आम्ही तळ्याजवळ पोहोचलो. फोटोग्राफीसाठी तलावाजवळ काही वेळ घालवला. १५ ते २० मिनिटे घालवल्यानंतर, सुमारे १२:३० वाजता पुढे गेलो आणि २५ ते ३० पायऱ्या चडून आम्ही चौथ्या दरवाज्याजवळील इमारतीसमोर पोहचलो, त्या वास्तूच्या भिंतीवर  शिल्पे बनवलेली होती, पण आमची नजरचुक झाली आणि गाद उतरते वेळी त्या शिल्पांनी आमचे लक्ष वेधून घेतले. आम्ही पुढे गेलो आणि पाचवा दरवाजा ओलांडला आणि वास्तूच्या दुसऱ्या बाजूला पोहोचलो. ती वास्तू दुसरे तिसरे काही नसून एक मंदिर होते ज्यात देवाची मूर्ती नव्हती. दरवाजाच्या चौकटीवर गजलक्ष्मीची मूर्ती होती. 

व्हिडिओ
व्हिडिओ

    मंदिर पाहून पुढे जात असतेवेळी, पाहिले की पुढे जाणारी वाट मोठ्या गवताने आणि झुडपांनी झाकलेला आहे, आम्ही काळजीपूर्वक पावले टाकत पुढे गेलो. आम्हाला एक इमारत दिसली जी आकाशी रंगाने रंगवलेली होती, आम्हाला वाटले की तो दर्गा असावा, नेहमीप्रमाणे जिहादींनी बेकायदेशीरपणे जमीन बळकावून दर्गा बांधला असावा म्हणून आम्ही त्या इमारती जवळ जाणे टाळले आणि पुढे गेलो. आणखी एक पाण्याची टाके दुर्ष्टीस पडले, पाण्याच्या टाक्याच्या बाजूने वर जाण्यासाठी एक मार्ग होता. पायर्यानं रेलिंग नव्हते, एक बाजू उघडी होती, म्हणून आम्ही काळजीपूर्वक पायऱ्या चढत पुढे गेलो. जर आमचा पाय घसरून तोल गेला असता तर थेट पाण्याच्या टाक्यात पडलो असतो. पाण्याचे टाके किती खोल आहे ह्याचा काही अंदाज नव्हता तसेच आम्हाला पोहता देखील येत नव्हते.

किल्ल्यावरील पाण्याचे टाके
गडावरील पाण्याचे टाके


    आम्ही सहाव्या प्रवेश द्वारातून प्रवेश केला आणि दोन खडकांना जोडणाऱ्या दगडी पुलावरून पुढे गेलो. पुढे जाऊन पहिले कि खडक निसरडा असल्या कारणाने, खडकावर पावलांचे आकार कोरलेले आहेत, जेणेकरून चालते वेळी पाय घसरून दोन खंडांच्या बेचक्यात पडून अपघात होऊ नये. पुन्हा आम्हाला एक पाण्याचं टाकं दिसल, गडावरील हे तिसरा पाण्याचं टाकं होता, पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नव्हतं. आम्ही वरच्या दिशेने पुढे गेलो आणि गडाच्या सातव्या आणि शेवटच्या दरवाज्याजवळ तसेच गडाच्या माथ्यावर पोहोचलो. आजवर मी पाहिलेल्या गडांपैकी हा एकमेव दुर्ग (देवगेरी दुर्ग वगळता) ज्याच्या सुरक्षेकरिता एका मागोमाग एक असे सात दरवाजे आहेत. आम्ही बालेकिल्ल्याच्या बुरुजाजवळ पोहोचलो तिथून जिल्ह्याचे विहंगम दृश्य दिसत होते. बुरुजावर विजेची व्यवस्था करण्यासाठी एक मोठे विद्युत उपकरण ठेवले होते. त्यामुळे तेथे फिरतेवेळी सावधगिरी बाळगावी लागत होती.

बालेकिल्ल्यातील बुरुज
बालेकिल्ल्यातील बुरुज


    आम्ही बुरुजावरून खाली आलो आणि १५-२० मिनिटे विश्रांती घेतली. पायथ्यापासून वर पोहोचण्यासाठी एक तास लागला. या ठिकाणी आमच्या पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्या! दुपारी १:१० वाजता आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. खाली उतरताना विनायकला फोटोग्राफीसाठी एक सुंदर जागा दिसली, विनायक आणि कौशल दोघेही फोटो काढण्यासाठी गेले. ५ मिनिटे घालवल्यानंतर आम्ही पुन्हा खाली उतरायला सुरुवात केली आणि पाण्याच्या टाक्या जवळ पोहोचलो. या ठिकाणी चालतेवेळी माझे पाऊल दोनदा घसरली, खडक कोरडा असल्याकारणाने मी बेसावधपणे, कोरलेल्या पावलांवर पाय न ठेवता चालत होतो. वेळीच स्वतःला सावरले, अन्यथा दोन खडकाच्या बेचक्यात पडल्याने प्राण गमवावे लागले असते. या प्रसंगा नंतर, मेंदूत थोडीफार शाबूत असलेली अक्कल वापरून, कोरलेल्या पावलांच्या आकारावर पावले ठेवत चालायला सुरुवात केली. 

    आम्ही आकाशी रंगाने रंगवलेल्या इमारतीत जवळ पोहोचलो, जसे मी आधी सांगितले होते की आम्हाला ही वास्तू दर्गा असल्याचे वाटले होते म्हणून आम्ही तिथे जाणे टाळले होते. ही जिहादी अतिक्रमण कश्या प्रकारे केले आहे ही पाहण्याची उत्सुकता मणी निर्माण झाली असल्या कारणाने, आम्ही जाऊन तपासण्याचा निर्णय घेतला. इमारतीच्या समोरील/पुढील भागात पोहोचल्यावर आम्हाला हिंदू मंदिरासारखे दोन खांब दिसले,  दरवाजा पिवळा रंगाने रंगवलेला पाहिला आणि त्यावर हळद आणि कुंकू लावलेले होते तसेच दारावर आंब्याचा डहाळा होता, एवढी सर्वे चिन्हे पाहिल्यावर निश्चित झाले कि हा दर्गा नसून मंदिर आहे. कौशल पुढे सरसावला व दरवाज्या जवळ पोहचला. मंदिराच्या दरवाज्याला सूर्य व चंद्रकोरीच्या आकाराची दोन छिद्र होती. मी कौशलला त्या छिद्रातून आत काय आहे ते पाहण्यास सांगितले, पण खोलीत अंधार असल्या कारणाने काहीच दिसत नव्हते. मी मोबाइल कॅमेराचा वापर करून आत पाहण्याचा प्रयत्न केला आणि जे दृश्य दिसले ते पाहून आम्ही तिघंही भारावून गेलो. आतमध्ये भवानी मातेची मूर्ती होती! दरवाजा कडी लावून बंदकेला होता, उघडावा कि नाही हा संभ्रम होता. अखेरीस कडी उघडली आणि आत प्रवेश केला. भवानी मातेचे दर्शन घेतले आणि बाहेर येऊन पुन्हा दरवाजा बंद करून घेतला. दर्गा समजून आम्ही येथे येयायला टाळत होतो, पण भवानी मातेला आम्हाला दर्शन देयायचे होते, म्हणून कीकाय आम्हाला ही वस्तू पुढे येऊन पाहण्याची बुद्धी झाली. 

भवानी देवीचे मंदिर
भवानी देवीचे मंदिर

भवानी देवीची मूर्ती
भवानी देवीची मूर्ती

    आम्ही गडावरून उतरत राहिलो आणि ज्या ज्या इमारतीच्या भिंतीवर कोरीव शिल्प होतीत्या इमारतीत जवळ पोहोचलो, आधी सांगितल्या प्रमाणे वर जातेवेळी आम्हाला ही कोरीव शिल्पे दृष्टीस पडली नव्हती. उतरतेवेळी मात्र ती विनायकाच्या  दृष्टीस पढली आणि विनायकने मला बोलावून घेतले, शरब काल्पनिक प्राण्याचे होते तसेच, इमारतीच्या डाव्या बाजूला शरबाचे आणखी एक कोरीव शिल्प दिसले आणि नंतर आम्हाला पोपट, गणेश, प्रभु श्रीराम आणि श्री हनुमान यांचे अनेक कोरीव शिल्पे आढळली. (शरभ हे शिल्प मुखतो गडाच्या दरवाज्यांवर किव्हा मुख्य बुरुजांवर दिसते, पण इथे असे मंदिराच्या मागच्या भिंतीवर लावलेले पाहून वाटते कि गडाच्या डागडुजी वेळी हे उचलून इथे लावली असावीत). आम्ही फोटो काढले आणि खाली उतरत राहिलो, आता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत थांबलो नाही. आम्ही दुपारी १:४५ च्या सुमारास पायथ्याशी पोहोचलो.

पोपटाचे शिल्प
पोपटाचे शिल्प

शरबाचे शिल्प
शरबाचे शिल्प

किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर, आम्ही एक सुंदर फोटो काढला आणि पुढे निघालो. प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर आम्हाला गावकरी नळातून पाणी भरताना दिसले, काही नळांवर कळशी मधून पाणी ओतू जात होते. आम्हाला आमच्या पाण्याच्या बाटल्या पुन्हा भरायच्या होत्या, या गावात आम्ही नवखे, तसेच भाषेचाही अडथळा, नळाखाली लावलेली कळशी बाजूला सरकावायची कशी ह्या संभ्रमात आम्ही होतो. इतक्यात काही महिला घराबाहेर बसल्या दिसल्या , म्हणून आम्ही बॅगेतून पाण्याच्या बाटल्या काढल्या आणि सांकेतिक भाषेत त्यांच्याकडे पाणी मागितले, तिने तिच्या मुलाला बोलावले आणि त्याला पाणी आणण्यास सांगितले. तिने सांकेतिक भाषेत विचारले की तुम्ही कुठून आहात आणि आम्ही उत्तर दिले "मुंबईहून". तिने हातात एक काठी पाहिली आणि तिला वाटले की ते ड्रोन आहे, आम्ही तिला सांगितले की ती सेल्फी स्टिक आहे, ड्रोन नाही. आम्ही पाण्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि पुढे निघालो. टीप: कन्नड भाषेत पाण्याला नीर म्हणतात.


    ऑटो ड्रायव्हरने आम्हाला जिथे सोडले होते तिथे आम्ही पोहोचलो, पण तो तिथे नव्हता, म्हणून आम्ही त्याला मोबाईलवर कॉल केला, पण त्याने काही उत्तर दिले नाही, अनेक प्रयत्न केल्यानंतर त्याने प्रतिसाद दिला आणि आम्हाला ५ मिनिटे थांबायला सांगितले कारण तो जेवणाकरिता गेला होता. काही वेळाने रिक्षावाला आला आणि आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि त्याला हुलीकेरी तलावाकडे घेऊन जाण्यास सांगितले. 👉पृष्ठाच्या सुरुवातीला जा



हुलिकेरी तलाव


    पुन्हा एकदा गुगल मॅप्सच्या मदतीने, आम्ही दुपारी २:०५ वाजता तलावा जवळ पोहोचलो. ऑटो ड्रायव्हर आम्हाला कमानी जवळ सोधले आणि आम्ही तलाव परिसर पाहण्यासाठी गेलो, तलावाच्या किनारी सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. आम्ही पार्कमध्ये पाऊल ठेवल्यावर सगळीकडे कचरा पाहून आम्ही निराशा झालो, स्थानिक लोकांनी या जागेला कचराकुंडी बनवले होते. सर्वत्र पान आणि गुटक्याचे लाल ठिपके होते. हा परिसर सुंदर आहे, पण स्थानिक स्थानिक लोकांना त्याची कदर नाही. आम्ही जास्त वेळ तिथे घालवला नाही, काही फोटो काढले आणि दुपारी २:३० वाजता हुलिगेम्मा मंदिराकडे निघालो. 

हुलिकेरी तलावाचे विहंगम दृश्य
हुलिकेरी तलावाचे विहंगम दृश्य


हुलीकेरी तलावाकडून परततेवेळी आम्ही जेवायचा निर्णय घेतला. आम्ही ऑटो ड्रायव्हरला जेवणासाठी एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये थांबण्यास सांगितले. होसापेटेहून आलो त्या मार्गावर रेस्टॉरंटसाठी पर्याय नसल्याने त्याने ऑटो होसापेटेच्या विरुद्ध दिशेने वळवली. आम्हाला सुखीभव नावाचे एक फॅमिली रेस्टॉरंट दिसले . जेवणाची गुणवत्ता, चव आणि सेवा चांगली होती, जर तुम्ही कोप्पळला भेट दिली तर रेस्टॉरंटची शिफारस करा. जेवणानंतर आम्ही दुपारी ३:२० वाजता हुलीगेम्मा मंदिराकडे आमचा प्रवास सुरू केला. 👉पृष्ठाच्या सुरुवातीला जा


हुलिगेम्मा मंदिर


    हुलिगेम्मा मंदिर कोप्पळ किल्ल्यापासून २४ किमी आणि होसापेटेपासून १४ किमी अंतरावर आहे. हे मंदिर मुनीराबाद येथे आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक. हुलिगेम्मा म्हणजेच येल्लमा, रेणुका देवी. आम्ही मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी दुकाने होती आणि मोठी पार्किंग जागा होती. आम्ही दुपारी ३:५० वाजता मुख्य प्रवेशद्वारापासून १००-२०० मीटर अंतरावर ऑटोमधून उतरलो. तेथे शूज रॅकची व्यवस्था होती, म्हणून आम्ही आमचे शूज गार्डला दिले आणि पुढे निघालो. मंदिर परिसरात प्रवेश करण्यापूर्वी, पाय धुवाण्या करीत प्रवेशद्वार बाहेर पाइपद्वारे पाणी सोडले होते, आम्ही आमचे पाय धुतले आणि पुढे निघालो. दक्षिण भारतातील बहुतेक मंदिरांमध्ये ही पद्धत वापरली जाते. प्रवेशद्वार सुंदरपणे बांधलेले आहे, त्यावर विविध देवतांच्या मूर्ती आहेत. आम्ही मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि रांगेत उभे राहिलो. आम्ही देवीचे दर्शन घेतले आणि मंडपातून बाहेर पडलो. आम्ही १५-२० मिनिटे मंदिर परिसरात घालवली आणि आवारातून बाहेर पडलो. गेटच्या डाव्या बाजूला बांबूच्या सावलीत एक मोठा लाकडी रथ ठेवला होता तो पहिला आणि आम्ही विंडो शॉपिंगमध्ये थोडा वेळ घालवला. सायंकाळी ४:३० वाजता आम्ही सूर्यास्त पाहण्याकरिता तुंगभद्रा धरणाकडे निघालो.

हुलिगेम्मा मंदिर परिसर
हुलिगेम्मा मंदिर परिसर


    हुलिगेम्मा मंदिरापासून तुंगभद्रा धरणाकडे जात असताना, आम्ही मुनीराबादमधील रेल्वे क्रॉसिंगवर सुमारे १०-१५ मिनिटे वाट पाहत होतो. ट्रेन जाणार असल्याने गेट बंद होता, आम्हाला वाटले की पुन्हा सूर्यास्त चुकणार, परंतु मुनीराबाद रेल्वे स्थानकावर ट्रेन बराच वेळ थांबल्याने गार्डने गेट उघडला आणि आम्ही तुंगभद्रा धरणाच्या दिशेने निघालो. 👉पृष्ठाच्या सुरुवातीला जा


तुंगभद्रा धरण


    आम्ही संध्याकाळी ५:१० वाजता तुंगभद्रा धरणावर पोहोचलो. आम्ही काउंटरवर प्रवेश तिकिटे घेतली आणि बससाठी रांगेत उभे राहिलो. दोन बस आल्या, पण दोन्ही बस ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने भरलेल्या. आम्ही सतत सूर्याकडे पाहत होतो, यावेळी आम्हाला सूर्यास्त चुकवायचा नव्हता. अखेरीस, १० मिनिटांनी बस आली. आम्ही संध्याकाळी ५:२५ वाजता धरणाच्या माथ्यावर पोहोचलो. सूर्यास्त टिपण्यासाठी आम्ही आमचा सेल्फी स्टँड उभारला. सूर्यास्ताचे दृश्य मंत्रमुग्ध करणारे होते आणि पाण्यावर सूर्याचे प्रतिबिंब आश्चर्यकारक होते, पण लवकरच एक घटना घडली जिनेआमच्या हृदयाचे ठोके एका सेकंदासाठी चुकवले. माकडांचा एक गट आला आणि त्यांनी मोबाईल आणि सेल्फी स्टँड उचलण्याचा प्रयत्न केला, सतर्कतेमुळे आम्ही वेळीच सेल्फी स्टँड आणि मोबाईल उचलला. माकडे गेल्यानंतर, आम्ही पुन्हा सेल्फी स्टँड उभारला आणि सूर्यास्त टिपला.

    सूर्यास्तानंतर आम्ही बसमध्ये चढलो आणि गेटवर पोहोचलो, यावेळी आम्ही लाईट शो पाहण्यासाठी गेलो नाही. आम्हाला बॅगा पॅक करण्यासाठी थोडा वेळ हवा होता. आम्ही ऑटो ड्रायव्हरला फोन केला आणि तो ऑटो ड्रायव्हर परशुरामसह आला, ज्याच्याशी आम्ही आजचा करार केला होता. तो पुन्हा अतिरिक्त शुल्काबद्दल रडू लागला कारण आम्ही प्रवास कार्यक्रमात तुंगभद्रा धरणाचा उल्लेख केला नव्हता, आम्ही त्याला सांगितले की आम्ही वेळेवर पोहोचलो होतो, तुंगभद्रा धरण त्याच मार्गावर होते आणि आम्ही कोणतेही अतिरिक्त अंतर प्रवास केले नाही. आम्ही ठरवलेले फक्त १८०० रुपये दिले. सुमारे ५:५० वाजता आम्ही हॉटेलवर पोहोचलो. 👉पृष्ठाच्या सुरुवातीला जा

तुंगभद्रा धरणावरून दिसणारा सूर्यास्त
तुंगभद्रा धरणावरून दिसणारा सूर्यास्त



मुंबईचा परतीचा प्रवास


    हॉटेलच्या खोलीत पोहोचल्यानंतर, आम्ही फ्रेश झालो आणि आमच्या बॅगा पॅक करायला सुरुवात केली, आमच्या सुट्ट्या संपल्या होत्या 😂. रात्री ८:४० वाजता आम्ही नैवेद्यम रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो . कर्नाटकातील हे आमचे शेवटचे जेवण होते म्हणून आम्ही थोड्या चांगल्या रेस्टऑरेंत मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. रेस्टऑरेंतमधील  वातावरण, जेवणाची चव, गुणवत्ता आणि सेवा खूप चांगली होती. आम्ही आमचे जेवण पूर्ण केले आणि रात्री १०:०५ वाजता फिरायला गेलो. होसपेटे बस स्टँड रस्त्यावरील ही आमची शेवटचा फेरफटका होता. भविष्यात आपण पुन्हा इथे येऊ की नाही हे माहित नाही! आम्ही रात्री १०:३० वाजता हॉटेलच्या खोलीत परतलो. आम्ही आमचे मोबाईल आणि पॉवरबँक रिचार्ज केले आणि २९ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री १२:३० वाजता आम्ही हॉटेल अमृता रेसिडेन्सीमधून चेक आउट केले. ट्रेनची आगमनाची वेळ १:३० होती, तरीसुद्धाआम्ही लवकर निघण्याचा निर्णय घेतला कारण, या परिसर आमच्या साठी नाविक होता रात्री उशिरा निघण्या पेक्षा रेल्वे स्थानकात जाऊन बसने योग्य वाटले. अवघ्या १५ मिनिटांत, सुमारे १२:४५ वाजता आम्ही होसपेटे जंक्शनला पोहोचलो. आम्ही एसी रिटायरिंग रूममध्ये ट्रेनची वाट पाहत बसलो.

    नेहमीप्रमाणे, भारतीय रेल्वेची ट्रेन १० मिनिटे उशिरा आली. आमचे एसी ३ टियर बुकिंग झाले होते, आम्ही ट्रेनमध्ये चढलो, सीट्सवर पोहोचलो आणि झोपण्यासाठी बेड तयार केले. आम्ही झोपायला जाणार इतक्यात टीसी आला आणि सीट नंबर विचारला, मी त्याला सीट नंबर सांगितला, पण त्याने सांगितले की या सीट्स काही इतर प्रवाशांसाठी राखीव आहेत. मग त्याने त्याच्या टॅबमध्ये बुकिंगची माहिती तपासली आणि सांगितले की तुमच्या सीट्स एसी २ टियरमध्ये अपग्रेड केल्या आहेत आणि आम्हाला ४ ते ५ डब्यांच्या अंतरावर असलेल्या दुसऱ्या डब्यात जावे लागेल. आम्हाला आयआरसीटीसीकडून अपग्रेडेशनबद्दल कोणताही संदेश मिळालेला नव्हता. आमची झोप भंग झाल्यामुळे आम्ही निराश झालो, परंतु दुसरीकडे, आम्हाला ३ टियर एसीच्या भाड्याने २ टियर एसीमध्ये प्रवास करण्याची संधी मिळाल्याने आम्ही आनंदी होतो 😆.

    आम्ही B4 डब्यातून A2 डब्याकडे प्रवास केला, पुन्हा झोपेसाठी बेड तयार केले आणि झोपायला गेलो. आम्ही सकाळी ८:३० वाजता उठलो. फ्रेश झालो आणि सकाळी ९:३० च्या सुमारास नाश्ता आणि चहा घेतला. चांगली गोष्ट म्हणजे खालचा बर्थ रिकामा होता, म्हणून आम्ही खालच्या बर्थवर बसलो आणि गप्पा मारण्यात वेळ घालवला. ट्रेनमध्ये एक सेल्समन मिठाई विकत होता, आम्ही त्याच्याकडून कुंदा नावाची मिठाई खरेदी केली , जो बेळगावचा एक प्रसिद्ध गोड पदार्थ होता. दुपारी १२:३० च्या सुमारास, एक मुलगा दुपारच्या जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी आला, आम्ही व्हेज पुलाव मागवला. दुपारी १:०० च्या सुमारास दुपारचे जेवण आले, आम्ही दुपारचे जेवण केले आणि रात्रीच्या जेवणाच्या योजनांबद्दल चर्चा करू लागलो, कारण ट्रेन उशिरा धावत होती आणि रात्री ९:३० च्या सुमारास कल्याण स्टेशनवर पोहचणार होती. कौशल आणि विनायक यांनी अनुक्रमे त्यांच्या बहिणीला आणि मामीला फोन करण्याचा निर्णय घेतला, कारण दोघेही पुण्यात राहतात आणि आमची ट्रेन पुणे जंक्शनवर थांबणार होती. दोघांनीही फोन करून पुणे स्टेशनवर जेवण आणण्यास सांगितले. दुपारी २:३० वाजता आम्ही झोपायला गेलो आणि ४:३० वाजता उठलो. आम्ही पुन्हा चहा घेतला आणि पुणे स्टेशन येण्याची वाट पाहत बसलो. संध्याकाळी ६:०० वाजता ट्रेन पुणे स्टेशनवर पोहोचली. कौशलची बहीण आणि विनायकची मामी दोघेही प्लॅटफॉर्मवर वाट पाहत होत्या. त्यांनी जेवणाचे डबे दिले आणि गप्पांमध्ये थोडा वेळ घालवला आणि संध्याकाळी ६:२० वाजता ट्रेन निघाली.

    रात्री ८:०० वाजता आम्ही जेवणाला सुरुवात केली, प्रथम आम्ही विनायकच्या मामीने आणलेले चविष्ट थालीपीठ खाल्ले आणि रात्री ८:४५ वाजता ३० मिनिटांचा ब्रेक घेतल्यानंतर आम्ही कौशलच्या बहिणीने आणलेले स्वादिष्ट भाजी चपाती खाल्ली. चविष्ट जेवणाबद्दल दोघांचेही आभार. रात्री ९:०० वाजता ट्रेनने कल्याणच्या दोन स्टेशन आधी असलेल्या वठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा घेतला. ट्रेन खूप हळू असल्याने आणि कुठेही थांबत असल्याने आम्ही विठ्ठलवाडी येथे उतरण्याचा निर्णय घेतला. आम्ही विठ्ठलवाडी येथे उतरलो आणि तिकीट काउंटरवरून तिकीट काढले. विनायक डोंबिवली येथे उतरला आणि आम्ही दोघेही रात्री १०:१० वाजता दादर येथे उतरलो. वडिलांकडून मला बातमी मिळाली की देखभालीच्या कामामुळे पश्चिम मार्गावर गाड्या उशिरा येत आहेत. इंडिकेटरने भाईंदर ट्रेनची आगमन वेळ रात्री १०:३० वाजता दाखवली होती, परंतु रात्री १०:४० नंतरही ट्रेन आली नाही, त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत होती. माझ्याकडे दोन बॅगा होत्या, त्यामुळे ट्रेनमध्ये चढणे खूप कठीण जाणार होते. अचानक मला बाबांचा फोन आला, मी परिस्थिती समजावून सांगितली; आणि त्यांनी मला खाजगी कॅब घेण्याचा सल्ला दिला, मी कॉल थांबवला आणि ताबडतोब ओला ऍप वापरून खाजगी कॅब बुक केली. मी रात्री ११:४० वाजता (गोरेगाव) घरी पोहोचलो.

    महाराष्ट्राबाहेर ही आमची पहिलीच सहल होती आणि पहिला अनुभव खूप छान होता, आम्हाला तो खूप आवडला. या सहलीत आम्हाला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार. गाईड सुरेश आणि ऑटो ड्रायव्हर नारायणन आणि त्याचा भाऊ लकी यांचेही आभार. ऑटो ड्रायव्हर परशुराम यांचेही आभार.



येथे हंपीचा दौरा आणि चौथ्या दिवसाचा शेवट

माझे दोन्ही प्रेमळ मित्र, कौशल आणि विनायक यांचे विशेष आभार, त्यांच्या सहकार्याशिवाय हंपी दौरा अशक्य होता.





खर्चाचा सारांश दिवस ४



एकूण खर्चाचा सारांश




खालील लिंक्सवर क्लिक करा


दिवस १ - तुंगभद्रा धरण

दिवस २ - उत्तर हंपी एक्सप्लोर करा

दिवस ३ - दक्षिण हंपी एक्सप्लोर करा